मंत्रालय

मराठा आरक्षणप्रकरणी शिंदे- फडणवीस सरकारवर विरोधकांचा हल्लाबोल

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यसरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमच्या हातात सत्ता येऊ द्या, दोन दिवसांत मराठा आरक्षण देतो, म्हणणारे कुठे आहेत? सरकारला ९ महिने झाले, मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही, असा सवाल संजय राऊत यांनी केला. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज असल्याचे सांगितले.

मराठा आरक्षण टिकून राहण्यासाठी राज्यसरकारने जून २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील न्या. एम. आर. शहा, न्या. संजीव खन्ना, न्या. एस. रवींद्र भट आणि न्या. व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या घटनापीठाने ही पुनर्विचार याचिका गुरुवारी फेटाळून लावली. १९९२ च्या निर्णयानुसार आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढवता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुनर्विचार याचिका फेटाळल्याप्रकरणी शिंदे – फडणवीस सरकारला जबाबदार धरले. या मुद्यावर सरकारने विधी व न्याय खात्यातील अधिकारी, राज्याचे महाअधिवक्ता, कायदा क्षेत्रातील तज्ञ मंडळी आणि विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन मराठा आरक्षणाबाबतची पुढची भूमिका ठरविण्याची गरज असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

हे सुध्दा वाचा :

मराठा आरक्षणाची लढाई पुन्हा सुप्रीम कोर्टात; महाराष्ट्र सरकार क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार

राज ठाकरे हे भाजपने पाळून ठेवलेले पोपट : संजय राऊत

मराठा आरक्षण प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे सरकारला दणका!

आमच्या हातात सत्ता येऊ द्या दोन दिवसांत मराठा व धनगर समाजाला आरक्षण देऊ, अशा बाता देवेंद्र फडणवीस यांनी केल्या होत्या. गेली ९ महिने त्यांच्याकडे सत्ता आहे, आता आरक्षणाचे काय झाले? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. आमच्या हातून सत्ता हिसकावून घेणाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या पुनर्विचार याचिकेकडे लक्ष दिले नसल्याची टीका राऊत यांनी केली.

Team Lay Bhari

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

11 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

11 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

12 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

12 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

12 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

15 hours ago