टीम लय भारी
मुंबई : राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकेका कल्पक उपक्रमाला मूर्त रूप द्यायला सुरूवात केली आहे. सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही सीबीएसई, आयसीएसई बोर्डातील शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी या बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसारच गेल्या वर्षी हा प्रस्ताव तयार केला होता. तो अखेर महापालिकेने मंजूर केला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या शिक्षण समितीचे सदस्य साईनाथ दुर्गे यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर २०१९ मध्ये हा प्रस्ताव मांडला होता. समितीने तो आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवला होता. आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या सकारात्मक अभिप्रायानंतर शिक्षण समितीने सीबीएसई व आयसीएसई बोर्डाची प्रत्येकी एक शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव नुकताच मंजूर केला आहे. जी – उत्तर विभागातील वूलन मिल मनपा शाळेमध्ये आयसीएसई, तर जोगेश्वरी येथील पूनमनगरमध्ये सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी ज्युनियर व सिनीअर केजी, तसेच इयत्ता पहिली ते सहावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. या शाळा येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहेत. प्रवेशार्थी विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण पुरविण्यात येणार असल्याची माहिती दुर्गे यांनी ‘लय भारी टीम’ला दिली.
हे सुद्धा वाचा
आदित्य ठाकरे जे बोलले, ते त्यांनी करून दाखवले
आदित्य ठाकरेंचा भन्नाट उपक्रम, जपानच्या सहकार्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविणार ‘ही’ योजना
आदित्य ठाकरेंच्या अभ्यासू मार्गदर्शनावर आयएएस अधिकारीही झाले चकीत
कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…
व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…
आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…