मुंबई

राज्यात कोरोनाचा उच्चांक, मुख्यमंत्र्यांनी पावसाळ्यात सज्ज रहाण्यासाठी दिले ‘हे’ निर्देश

राज्यात २४ तासांत तब्बल २५ हजार ८३३ नवीन रुग्णांची नोंद

टीम लय भारी

मुंबई : एकीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी लसीकरणाचा वेगही वाढविण्याचे आव्हान आपल्यासमोर असून येत्या तीन ते चार महिन्यांत प्राधान्य गटातील सर्वांना दोन डोस द्यायचेच आहेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. तसेच गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या फिल्ड रुग्णालयांमध्ये रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे येणारा पावसाळा लक्षात घेऊन त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे व आवश्यक ती देखभाल व दुरुस्ती करून घ्यावी जेणेकरून पावसाचा त्रास होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे आज विभागीय आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे कोविड लसीकरण व कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात दर दिवशी आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा आज रोजीची संख्या उच्चांकी असून राज्यातील जिल्हा प्रशासनाने अतिशय वेगाने रुग्ण आणि त्यांचे संपर्क शोधणे गरजेचे आहे. त्यासोबत निर्बंधांचे आणि आरोग्य नियमांचे काटेकोर पालन व्हायला हवे यासाठीही पावले उचलण्याची गरज आहे, असे निर्देश या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले. कोरोना विषाणूच्या बदलत्या लक्षणांची नोंद वैद्यकीय तज्ज्ञांनी घ्यावी. तसेच आवश्यक त्या उपचार पद्धतीविषयी राज्यातील डॉक्टर्सना मार्गदर्शन करावे, अशी महत्त्वाची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

कोविड लसीकरणात महाराष्ट्र हा संपूर्ण देशात राजस्थाननंतर दुसऱ्या क्रमांकावर असल्याची बाब समाधानकारक आहे. मात्र दर दिवशी ३ लाख लस दिल्या पाहिजेत यादृष्टीने नियोजन करावे, असे मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागास सांगितले. राज्यात बहुतांश ठिकाणी तीव्र उन्हाळा असतो, त्याचा परिणाम लसीकरणावर होऊ शकतो हे गृहित धरून नागरिकांना दुपारच्या आत किंवा दुपारनंतर व उशिरा रात्री पर्यंत लस देण्याची व्यवस्था करावी तसेच ज्येष्ठ व सहव्याधी रुग्ण रांगांमध्ये उभे असतात त्यांची गैरसोय होणार नाही व कुठेही वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात १३४ खासगी रुग्णालयांना बुधवारी केंद्राने लसीकरणासाठी मान्यता दिली असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अभिषेक सावंत

Recent Posts

मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना…

5 hours ago

हिरावाडी रोडवर मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या पाईपांना भीषण आग

हिरावाडी रोडवरील (Hirawadi Road) नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना (pipes)…

6 hours ago

ई-कुबेर प्रणालीमुळे दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष

नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी…

6 hours ago

पीके करपल्यावर पाण्याचे आवर्तन; शेतकऱ्यांचा संताप

एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने…

7 hours ago

‘खरे शिवसेना प्रमुख असाल तर…’ रत्नागिरीतून अमित शाहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)…

7 hours ago

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

17 hours ago