Categories: मुंबई

एकनाथ शिंदेंच्या नुसत्याच बेटकुळ्या, विधानसभेत तोंडावर आपटण्याची शक्यता, शरद पवारांच्या खेळीकडे लक्ष

टीम लय भारी

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी आपल्या बाजूने ५० आमदार वळविण्यात यश मिळविले आहे. त्यापैकी ४० आमदार शिवसेनेचे असल्याचा दावा केला जात आहे. वास्तवात, मात्र यातील सगळेच आमदार विधानसभेच्या सभागृहात ‘महाविकास आघाडी’ सरकारच्या विरोधात मतदान करतीलच याची शक्यता नाही. एकनाथ शिंदे सभागृहात तोंडावर आपटण्याच्या दृष्टीने ‘महाविकास आघाडी’चे नेते कामाला लागल्याचे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

‘महाविकास आघाडी’ सरकारला काहीही होणार नाही. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील. बाहेर गेलेल्या आमदारांना मुंबईत यावेच लागेल, असे सूचक विधान शरद पवार यांनी गुरूवारी केले. या विधानामागे अनेक डावपेचात्मक अर्थ दडलेले आहेत. सोबतचे आमदार फुटू नयेत. त्यांचे मन परिवर्तन होऊ नये या उद्देशाने एकनाथ शिंदे यांनी फुटीर आमदारांना गुवाहाटीला नेले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.

उद्धव ठाकरे सरकारला येत्या काही दिवसांतच विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागेल. त्यावेळी संभाव्य मतदानासाठी बाहेर गेलेल्या आमदारांना सभागृहात हजर राहावे लागेल. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार फुटलेले आहेत, शिवाय १० अपक्ष त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाचे मतदान विरोधात गेल्यास उद्धव ठाकरे सरकार कोसळेल असे चित्र सकृतदर्शनी दिसत आहे.
वास्तवात मात्र, शिवसेनेच्या ४० आमदारांपैकी बरेचसे आमदार उद्धव ठाकरेंच्या, म्हणजेच सरकारच्या बाजूने मतदान करतील.

गुलाबराव पाटील, सदा सरवणकर, दादा भुसे यांच्यासारखे आमदार अगोदर उद्धव ठाकरे यांना भेटले, अन् तिथून ते गुवाहाटीला गेले. यात ठाकरे यांनी केलेली गेम असल्याचे सूत्रांनी सांगितले. गुवाहाटीला नंतर गेलेले आमदार हे उद्धव ठाकरे यांनीच पाठविले आहेत. ते ठाकरे यांचे गुप्तहेर म्हणूनच तिथे पोहचल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदेंची खेळी हाणून पाडण्याचा डाव यात आखला गेला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

एकनाथ शिंदे गटाचे आमदार ज्यावेळी मुंबईत येतील, अन् सभागृहात प्रत्यक्षात मतदान करतील. त्यावेळी त्यांचे मत व मन परिवर्तन झालेले असेल, अन् एकनाथ शिंदे तोंडावर आपटलेले दिसतील, असे सूत्रांनी सांगितले. एकनाथ शिंदेंना खिंडीत गाठण्यासाठी शिवसेनेने नियोजन केले आहेच, पण त्यांना शरद पवार हे सुद्धा डावपेचात्मक मार्गदर्शन करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकनाथ शिंदेंसह १२ आमदारांच्या निलंबनाची केलेली मागणी सुद्धा याच डावपेचांचा भाग असल्याचे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा :

महाराष्ट्रातील राजकारणाची वाटचाल गुंडगिरीच्या दिशेने

एकनाथ शिंदेंना परत आणण्यासाठी गेलेला शिवसैनिक म्हणाला, ‘मला बरंच बोलायचं आहे, पण पोलिसांचं लक्ष माझ्यावर आहे.’

‘या ‘महाभारतामागे भारतीय जनता पक्षाचाच हात

पूनम खडताळे

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

10 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

11 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

11 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

12 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

12 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

14 hours ago