मुंबई

मुंबईच्या सौंदर्यावर डांबराचे गोळे आणि कचऱ्याच्या ढिगांचे तीट

टीम लय भारी 

मुंबई : मुंबई शहराला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभल्याने हे सौंदर्य नेहमीच सगळ्यांना खुणावत असते, परंतु ते सौंदर्य पाहताना प्लास्टिक किंवा इतर तत्सम गोष्टी अनावधानाने तिथेच फेकल्यामुळे घाणीचे साम्राज्य सहज दिसू लागते. मुंबईतील जुहू बीच वर सुद्धा असेच काहीसे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तिथे मोठ्या प्रमाणात डांबराच्या गोळ्यांचा खच पडल्याचे दिसून येत आहे, शिवाय प्लास्टिक, इतर कचरा सुद्धा विखूरलेला दिसत आहे.

जूहू बीचवर डांबराच्या गोळ्यांचा मोठा खच पडल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे, तर कच्च्या तेलाच्या गळतीमुळे हे डांबराचे गोळे तयार झाले असावेत असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान शहरात जोरदार पाऊस सुरू झाल्याने पावसामुळे समुद्रातील इतर कचरा सुद्धा किनाऱ्यावर पुन्हा फेकला गेला आहे.

दरम्यान, डांबराचे गोळे अनेक वेळेस समुद्रकिनारी दिसतात, परंतु या गोळ्यांमुळे केवळ समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्यच नष्ट होत नाही तर खेकडे आणि इतर उभयचर प्राण्यांच्या जीवीतास सुद्धा धोका निर्माण होते, त्यांच्या प्रजननास अडथळा निर्माण होतो असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा…

महाराष्ट्र पोलिसांचा आम्हाला सार्थ अभिमान – सुप्रिया सुळे

नदीचे पाणी शाळेत शिरले, जीव वाचवण्यासाठी मुलांची धावाधाव

ईडी कार्यालयाला पुढील अडीच वर्षे सुट्टी? हर्षल प्रधान यांचा यंत्रणांना कडवट सवाल

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

10 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

11 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

11 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

12 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

12 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

14 hours ago