मुंबई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण, सिडकोने दिली माहिती

टीम लय भारी

नवी मुंबई : सिडको महामंडळातर्फे साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai International Airport) प्रकल्प क्षेत्रातील गावांमधील एकूण तीन हजार ७० बांधकामे पाडण्यात आली. एक हजार १६० हेक्टर क्षेत्रफळ विमानतळ सवलतदार यांना हस्तांतरित करण्यात आले आहे. (Navi Mumbai International Airport project completed)

या गावांतील सुमारे पाच हजारांहून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन आणि पुन:स्थापना क्षेत्रातील पुनर्वसन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यामुळे सिडकोने नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. विमानतळ (Navi Mumbai International Airport) क्षेत्र विकासकामांसाठी सज्ज झाले आहे.

विमानतळ गाभा क्षेत्रातील तीन हजार ७० इमारती सिडकोकडून पाडण्यात आल्या आहेत. या इमारतींमधील पाच हजारांहून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन आणि पुन:स्थापना क्षेत्रात स्थलांतर (Navi Mumbai International Airport) करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.


सार्वजनिक वापरातील इमारती, चर्च तसेच सार्वजनिक व खासगी मालकीची मंदिरे मिळून एकूण ५६ मंदिरांचे पुनर्वसन क्षेत्रात स्थलांतर करण्यात आले. ग्रामस्थांच्या सहकार्याने मूर्तींची सन्मानपूर्वक (Navi Mumbai International Airport) प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. समाज मंदिर, शाळा आणि स्मशानभूमी मिळून एकूण २७ बांधकामे पाडण्यात आली आहेत.

विमानतळ क्षेत्रातील महत्त्वाची विकासपूर्व कामे यापूर्वीच पूर्ण झाली आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai International Airport) प्रकल्प नियोजित वेळेनुसार पार पडत असून हा प्रकल्प मार्गी लागला आहे.

हे सुद्धा वाचा :-

Navi Mumbai International Airport: CIDCO achieves milestone as it clears airport site

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी भाजप महाराष्ट्राचे अभिनंदन केले

राज्यपालांच्या हस्ते आयएनएस विक्रांतच्या प्रतिकृतीचे उदघाटन

 

Jyoti Khot

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

3 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

4 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

4 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

5 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

5 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

7 hours ago