मुंबई

मुंबईत पावसाने घातले थैमान; लोकांचे जनजीवन विस्कळीत

टीम लय भारी

मुंबई :- मुंबई, ठाणे व पालघर भागात पावसाने थैमान घातला आहे. बाहेर पडणाऱ्या हौशी पर्यटकांसाहित घरात थांबणाऱ्या सुज्ञ नागरिकांना सुद्धा या पावसामुळे बरेच मोठे नुकसान भोगावे लागले आहे (Rains disrupt life in Mumbai).

ठाण्यातील विक्रोळी भागात झालेल्या भूस्खलनामुळे घरात अडकलेल्या लोकांचे 23 बळी गेल्याचे समोर येत आहे, तसेच सीबीडी परिसरात फिरायला गेलेल्या हौशी ट्रेकर्सना अग्निशमन दलाने मदत करून सुखरूप धोक्याच्या बाहेर काढले आहे.

मी उत्तर द्यायला तयार आहे, उत्तरे देण्याची सरकारला संधीही द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहिल्या वनडेत भारताचा 7 गडी राखत श्रीलंकेवर दणदणीत विजय…

रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. कल्याण ते ठाणे दरम्यान मध्य रेल्वे काही काळासाठी बंद करण्यात आलेली आहे. रुळांवर पाणी साचले आहेच परंतु मध्य रेल्वेच्या काही स्टेशनवर प्लॅटफॉर्म पर्यंत पाणी चढले आहे त्यामुळे धोक्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे (A dangerous situation has arisen).

मिठी नदीला धोका उत्पन्न झाला आहे. मिठी नदीचा धोका दर्शवणारे नियम 3.3 पाणी झाले की धोकादायक म्हणून सांगितले जाते. परंतु मिठी नदीचे पाणी 4.2 पर्यंत वाढले आहे. तिथल्या वस्त्या पालिकेने उठवल्या आहेत आणि त्यांना पालिकेच्या शाळांमध्ये पाठवण्यात आलेले आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस

भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणे शक्य नाही; नवाब मलिक

Mumbai Rains LIVE Updates: IMD issues red alert for Mumbai, Thane and Palghar

पालघर जिल्ह्यात सुद्धा अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे नुकसान झालेले आहे. 40 गॅसची सिलिंडर पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहेत तसेच कार खेळण्यातल्या गाड्यांसाख्या रस्त्यावरून वाहताना दिसत आहेत.

ठाणे भागात एक 40 वर्षाचा माणूस झाड कोसळल्यामुळे गंभीर अवस्थेत आहे. तर त्याच झाडाचा फटका 5 चारचाकी गाड्या आणि अन्य वाहनांना बसलेला आहे. उल्हासनगर येथील एक 4 वर्षाचे लहान मूल सुद्धा वाहून गेले आहे. एका 16 वर्षाच्या मुलांचाही या पावसामुळे मृत्यू झाल्याचे समजते.

Rasika Jadhav

Recent Posts

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole )…

5 mins ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

23 mins ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

3 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

3 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

3 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

4 hours ago