टीम लय भारी
मुंबई : महाराष्ट्रात १५ दिवसांपूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला. या राजकीय भूकंपामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि आता शिंदे-भाजप सरकार सत्तेच्या गादीवर बसले. पण हे सर्व करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाचा वाटा होता. राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबाबत देवेंद्र फडणवीस यांनी १०-१२ दिवस बोलणे टाळले. पण शिवसेनेचे आमदार फोडण्यामध्ये फडणवीसांची मोठी खेळी असल्याचे सर्वांनीच सांगितले. आणि याबाबतची कबुली स्वतः विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
दोन दिवस झालेल्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते आणि देवेंद्र फडणवीस हे आमदार झोपल्यानंतर भेटायचे याबाबत सांगितले. याच भेटीचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस हे आपला वेष बदलून एकनाथ शिंदे यांना भेटायला जायचे. वेगवेगळे कपडे परिधान करून, मोठा चष्मा लावून ते भेटण्यासाठी जायचे. त्यांच्या बदलेल्या वेशात मी देखील त्यांना ओळखू शकत नव्हते, असे सांगत अमृता फडणवीस यांनी भेटीचा गौप्यस्फोट केला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनाच्या भाषणात मी आणि देवेंद्र फडणवीस सगळे आमदार भेटल्यावर झोपायचो आणि आमदार उठायच्या आधी मी हॉटेलवर पुन्हा यायचो. पण कोणालाच कळत नसायचे. या सगळ्या घटनेतील मुख्य कलाकार देवेंद्र फडणवीस आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.
हे सुद्धा वाचा :
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई येथे भरती सुरु
मुख्यमंत्री महापालिकेत आले, भाजप – सेना नेत्यांनी त्यांचा सत्कार केला
शहाजीबापू पाटील सांगोल्यात परतले अन् म्हणाले, बोकडाचं मटण कसे ओरपायचे ते शिकवतो
आईचे छत्र हरपल्याने काकूकडे राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या (girl killed) केल्याची घटना…
ओएलक्सवर ( OLX) साहित्य विक्री करणाऱ्या ग्राहकांची खरेदीदार संशयितांनी बोगस क्यूआर कोडचा झोल करुन सायबर…
काँग्रेस (congress) पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून…
हृदय सम्राट बाबा हरदेवसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ समर्पण दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे .संत…
धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर(Dhangar community leader Gopichand Padalkar ) यांनी रविवारी मंत्री…
लोकसभेची ही निवडणूक (Lok sabha election) साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष…