टीम लय भारी
मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले. मुंबई, पुणे, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरुन आंदोलने केली. या आंदोलनात ऐंशी वर्षांच्या आजी देखील सहभागी झाल्या होत्या. या आजींची यापूर्वी उध्दव ठाकरेंनी भेट घेतली होती.
एकनाथ शिंदे गद्दार आहेत. ते शिवसेना सोडून गेल्याने काही फरक पडणार नाही. त्यांनी गद्दारी केली आहे असे आजींनी आंदोलनाच्या वेळी सांगितले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या समर्थनार्थ आज संध्याकाळी शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेच्या विरोधात घोषणाबाजी केली.
काल झालेल्या विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात मोठे रणकंदन माजले आहे. एकनाथ शिंदेंनी 35 नाराज आमदारांना घेवून सुरत गाठले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व धोक्यात आले. या निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे अनेक आमदार नाराज होते. त्यांनी एकत्र येवून ही बंडाळी केल्याचे बोलले जात आहे. शिवसेना नेत्यांनी बंडाळी करण्याची अनेक कारणे आहेत. मात्र आता अल्पमतात आलेले महाविकास आघाडीचे सरकार तरणार की पडणार याकडे देशाचे लक्ष लागून आहे. कारण ‘मी पुन्हा येईन‘ अशी प्रतिज्ञा केले देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे सुद्धा वाचा :
जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…
तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…
डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…
उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…
गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…
कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…