टीम लय भारी
नवी दिल्ली: आज लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. या अधिवेशनात अनेक विषयांवर चर्चा झाली. यामध्ये भारतीय लोकांनी नागरिकत्व सोडल्याची धक्कादाय माहिती उघड झाली. तीन वर्षांत सुमारे 4 लाख नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे. ही आकडेवारी गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सादर केली.
मोदी सरकारच्या काळात 2021 मध्ये सर्वात जास्त भारतीयांनी नागरिकत्व सोडले.तीन वर्षांत तब्बल 3, 92, 643 लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले. मंत्री नित्यानंद राय यांच्या आकडेवारीनुसार 20019 मध्ये 144017 तर 2020 मध्ये 85256 आणि 2021मध्ये 163370 नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडले.
भारतीय नागरिकत्व सोडण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये विदेशात नोकरीची संधी असल्याने अनेकजण तिथेच स्थायिक होत आहेत. तसेच भारतातील वाढती लोकसंख्या. भारतात लोकसंख्या जास्त असल्याने होणारी स्पर्धा. ही कारणे आहेत. त्या तुलनेत विदेशात स्पर्धा कमी असल्याने सहज नोकरी लागण्यास मदत होते .
मोदी सरकारने निवडणुकीपूर्वी भारतीयांना ‘अच्छे दिन‘ येणार असे सांगितले होते. तसेच ‘सबका साथ सबका विकास‘ होणार असेही सांगितले होते. मात्र ज्यांना ‘मोदीराज‘ पटले नाही, ते देश सोडून परदेशात कायमचे राहण्यास जात आहेत. याला जबाबदार कोण? परदेशात नोकरी करुन पुन्हा भारतात येणे ठिक वाटते. पण कायमचे देश सोडून जाणे नक्कीच कोणालाही आवडणार नाही. आताच्या पिढीला देशाभिमान वगैरे काहीच राहिलेला नाही. ते देशाला इतके का? कंटाळले याचे उत्तर मोदी सरकारने जनतेला दयावे.
हे सुध्दा वाचा:
‘या‘ माफियांना कोणाचा आशिर्वाद ?
शिवाजीराव आढळराव यांनी फोडले संजय राऊत यांचे बिंग
’उध्दव ठाकरेंनी शरद पवारांची साथ सोडावी’ – रामदास कदम
चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना…
हिरावाडी रोडवरील (Hirawadi Road) नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना (pipes)…
नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी…
एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने…
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)…