राष्ट्रीय

मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे मोठे पाऊल; तीन माजी महिला न्यायमुर्तींची समिती स्थापन

मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार माजला आहे. काही दिवसांपूर्वी महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले होते. मणिपूर हिंसाचार प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाने मोठे पाऊल उचलले आहे. मणिपूर हिंसाचार रोखण्यात सरकारला यश येत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने फटकारले होते. तसेच सरकार काय कारवाई करत आहे, ते सविस्तर सांगा अन्यथा आम्ही आमच्या पातळीवर पावले उचलू असे न्यायालयाने म्हटले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

मणिपूर हिंसाचारात प्रभावित झालेल्या लोकांच्या मदत आणि पुनर्वसन कार्यावर देखरेख ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तीन माजी महिला न्यायाधीशांची समिती स्थापन करण्याची घोषणा केली. या समितीमध्ये हायकोर्टाच्या माजी न्यायमूर्ती गीता मित्तल, शालिनी जोशी, आशा मेनन यांचा समावेश करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश गीता मित्तल या तीन सदस्यीय समितीच्या अध्यक्षा असतील. त्याच प्रमाणे हिंसाचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयवर लक्ष ठेवण्यासाठी एका माजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची देखील नेमणूक करण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा 

भरबाजारात कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीची हत्या; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

राहुल गांधी यांचे संसदेत आगमन; विरोधकांमध्ये संचारला उत्साह

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षभरात १०० कोटी रुपयांची मदत

गेली तीन महीने मणिपूरमध्ये हिंसाचार घडत आहे. दोन समुदायांमध्ये सुरु असलेला हा हिंसाचार रोखण्यात येथील सरकारला अद्याप यश आलेले नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी स्वत:हून दखल घेत केंद्र आणि राज्य सरकारला हिंसाचार रोखण्यासाठी पाऊले उचलावित असे सुनावले होते. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने याआधी देखील सरकारला फटकारले होते. मणिपूर सरकारने हिंसाचार रोखण्यासाठी काय पाऊले उचलली याचा लेखाजोखा मागितला होता. तसेच याप्रकणी आम्ही पाऊले उचलू असे देखील सुनावले होते. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणात तीन माजी महिला न्यायमूर्तींची समिती स्थापन केली आहे.

प्रदीप माळी

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

5 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

6 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

9 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

9 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

9 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

10 hours ago