भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने टी-20 विश्वचषकात चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. विराटने नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात 44 चेंडूत नाबाद 62 धावा करत टीम इंडियाला शानदार विजय मिळवून दिला. कोहलीने रोहितसह दुसऱ्या विकेटसाठी 73 धावा आणि सूर्यकुमार यादवसोबत तिसऱ्या विकेटसाठी 95 धावांची अखंड भागीदारी केली. विराट कोहली टी20 विश्वचषकात विश्वविक्रमाच्या जवळ पोहोचला आहे. विराट कोहलीचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. यापूर्वी त्याने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 53 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली होती. भारताने हा सामना चार गडी राखून जिंकला. विराटच्या T20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 989 धावा झाल्या आहेत. त्याने 23 सामन्यांच्या 21 डावांमध्ये या धावा केल्या आहेत. T20 विश्वचषकात 1000 धावा करणारा कोहली दुसरा फलंदाज बनू शकतो. कोहलीने चालू विश्वचषकातील दोन सामन्यांमध्ये 144 धावा केल्या आहेत.
विराट विश्वविक्रमापासून 28 धावा दूर आहे
अनुभवी उजव्या हाताचा फलंदाज विराट कोहली 28 धावा करताच T20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल. सध्या फक्त श्रीलंकेचा दिग्गज महेला जवर्धने त्याच्या पुढे आहे. जयवर्धनेने T20 विश्वचषकातील 31 सामन्यांमध्ये एकूण 1016 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये नाबाद 122 ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याने T20 वर्ल्ड कपमध्ये 138.45 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.
हे सुद्धा वाचा
Mumbai : कुत्र्यांना खाऊ घालण्यासंदर्भातील निर्णयाविरोधात मुंबईत प्राणीमित्र संघटनेचे आंदोलन
PAK vs ZIM : पाकिस्तानचा पराभव होताच सोशल मीडियावर ‘मिस्टर बीन’ ट्रेंडिंगला; वाचा काय आहे प्रकरण
कोहलीने 36 अर्धशतके झळकावली आहेत
33 वर्षीय विराट कोहली सध्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. कोहलीने 111 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 3856 धावा केल्या आहेत. या यादीत कोहलीनंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा क्रमांक लागतो. रोहितने 144 सामन्यात 3794 धावा केल्या आहेत. कोहलीच्या नावावर T20 विश्वचषकात 12 अर्धशतके आहेत, तर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 36 अर्धशतके झाली आहेत.
मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…
अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…
फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…
हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…
'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…