“माझ्यावर केलेल्या आरोपांवर जरांगेंनी माफी मागावी. जरांगेंमुळेच आज मराठा समाजाचा अपमान झाला आहे. मला शिवीगाळ आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला जातोय. माझा आणि देवेंद्र फडणवीसांचा काही संबंध नाही. मारुतीच्या मंदिरात बसून आरक्षण मिळत नाही. घेतलेला निर्णय मागे घेण्याची नामुष्की जरांगेवर आली. खोट्या आरोपांमुळे माझ्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली. पण पुरव्याशिवाय आम्ही बोलत नाही. जरांगेंनी काल तमाशा केला”, असे आक्रमक मत अजय बारसकर यांनी मांडले.
अजय बारसकर प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, “उपोषण करत असून जरांगेंमध्ये दहा हत्तीचं बळ कसं काय आलं. या बाबाने इतकं नाटक केलं की, कालचा सगळा तमाशा होता. माझा आणि फडणवीसांचा काहीही संबंध नाही. माझ्याइतकी भाजपवर कुणी टीका केलीच नाही आणि हे मला भाजपचा कार्यकर्ता ठरवता. जरांगे पाटील तुम्ही मरावे आणि गावोगावी दंगली-जाळपोळ व्हावे, अशी तुमची इच्छा आहे का?”, असा प्रश्न अजय बारसकरांनी उपस्थित केला.
हेही वाचा : “आया-बहिणी घरदार सोडून…” वडेट्टीवारांच्या प्रश्नाला अजित पवारांनी दिलं रोखठोक उत्तर
बारसकर म्हणाले की, “मराठा समाजाला समजतच नाहीय, जरांगेने खूप नाटक केलंय. चार दिवसांपूर्वी दोन माणसं धरून चालवत होते. तोच माणूस 16 व्या दिवशी 15 माणसांना ऐकेना, हत्तीचं बळ कुठून आलं? काय ताकद आहे? काय जादू? कधीतरी जागं व्हा. अतातायीपणा करण्याआधी विचार केला नाही. माझ्या चारित्र्यावर संशय उडवले, कुठेय ती महिला, का आणलं नाही समोर, कुठेय 300 कोटी? का पुरावे आणले नाही?”
हेही वाचा : एकनाथ शिंदे सरकार कंत्राटदारांचे, घोटाळबाजांचे; विजय वडेट्टीवारांचे घणाघाती आरोप
“सरकारकडून काम करून घ्यायचं असेल तर सभ्य भाषेत बोलावं लागतं. जातीवरून तुम्ही शिव्या दिल्या. उठसूठ शिव्या दिल्या. मुख्यमंत्री म्हणाले लिमिटच्या पुढे गेलं की करेक्ट कार्यक्रम करतो. तुमचा करेक्ट कार्यक्रम झाला नाही तर तुमच्या मागे असलेल्या समाजाचा होतो. सरकारची इच्छाशक्ती असेल तर यंत्रणा काम करते. दोन दिवसात कुणबीचे दाखले दिले. मराठा समाजाचा रेटा होता. पण जरांगे पाटील तुम्ही चुकलात”, असेही बारसकर म्हणाले.
हेही वाचा : Maratha Reservation : जरांगे-पाटलांना बेअक्कल म्हणणारे अजय बारसकर आहेत तरी कोण?
सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…
आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…
स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…
भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…
कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…
डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…