राजकीय

महाराष्ट्र बंदवरून आशिष शेलारांची राज्य सरकारवर टीका

टीम लय भारी

मुंबई: राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी (Maha vikas aghadi) सरकारने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी राज्यव्यापी बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली आहे. लखीमपूर खेरी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ७० किमी अंतरावर टिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी चार शेतकरी होते. दरम्यान, सत्ताधारी पक्षांनी बंदचं आवाहन केल्यानंतर विरोधी पक्ष भाजपाने सरकारवर टीका सुरू केली आहे (Ashish Shelar criticizes state government over Maharashtra bandh).

 भाजपा नेते आशिष शेलार यांनी सरकारच्या या बंदचा निषेध करत ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवले त्या तथाकथित “बंदसम्राटांचा” पुन्हा आज इतिहास आठवा, असं म्हटलंय.

महादेव जानकर यांच्या एका निर्णयाने 432 जणांच्या घरी दिवाळी साजरी

ज्योतिरादित्य शिंदेंनी मराठी लोकांची मने जिंकली

राज्य सरकारवर निशाणा साधत शेलार म्हणाले, की “यांनीच मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उध्वस्त केले. युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी, श्रमिकांना देशोधडीला लावले,” असा आरोप त्यांनी केला.

एवढेच कशाला आता, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करुन मुंबईकरांना वेठीस धरले आहे. आधी कोस्टल रोडला विरोध, नंतर नवी मुंबई आणि चिपी विमानतळाला विरोध त्यानंतर समृद्धी महामार्गला यांनी विरोध केलाय. हे सरकार मेट्रोचेही विरोधकच आहेत,” असं त्यांनी म्हटलंय.

विमानतळ उद्घाटनाला विनायक राऊतांनी दिवसाचे २४ तास आणि वर्षांचे १२ महिने पाठपुरावा केला : सुभाष देसाई

Maharashtra bandh live: 8 BEST buses vandalised, local train services unaffected till now

हे सरकार मेट्रोचेही विरोधक असून ते राज्याच्या विकासाचे गतीरोधक आहेत, बंद आणि विरोध हाच यांचा धंदा असून त्यावरच त्यांचा चंदा गोळा होतो. या सरकारने आई जगदंबेच्या नवरात्रीत महाराष्ट्र बंद केलाय, ही या तिघाडीतील तीन पक्षांची “महिषासुरी” चाल आहे. आई दुर्गामाते तू राज्यातील जनतेला या महिषासुरांचा खेळ उधळून टाकण्याचं बळ दे, असं म्हणत आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राज्याची राजधानी मुंबईत सुरक्षा कडक करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक गस्त घालण्यात येणार असल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) तीन कंपन्या, ५०० होमगार्ड आणि स्थानिक शस्त्र युनिटमधील ७०० जवानांसह स्ट्राइकिंग साठा देखील मोक्याच्या ठिकाणी तैनात केला जाणार आहे.

कीर्ती घाग

Recent Posts

सुडबुद्धीचे राजकारण नाशिककर खपवून घेणार नाहीत- बडगुजर

राजाभाऊ वाजे (Rajabhau waje) यांना सर्व थरातून मिळत असलेला पाठिंबा बघता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू…

32 mins ago

देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्रात ‘उबाठा’ ही सहभागी केशव उपाध्ये यांचा हल्लाबोल

हिंदु समाजातील उपेक्षित, वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम समाजातील तिहेरी…

47 mins ago

कॉंग्रेसच्या विकासनितीमुळेच आमची प्रगती, तरीही आमच्या मुलाच्या डोक्यात मोदीप्रेम !

लय भारीचा शिर्डी मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा सुरू आहे. यादरम्यान मतदार संघातील मतदारांना भेटून…

1 hour ago

म्हशीच्या बाजारात निलेश लंकेंचा चाहता भेटला, विखे पितापुत्रांवर जाम संतापला !

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता होवू घातला आहे या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून…

2 hours ago

कट्टर हिंदू, मोदींचा २०१४ मधील भक्त, आता मोदींवर तोफा डागतोय

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता होवू घातला आहे या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून…

4 hours ago

भुजबळांकडून ‘तुतारी’चा प्रचार, मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; आमदार कांदेंची मागणी

सध्या लोकसभा निवडणुकांची  धामधूम सुरु असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून जोरदार प्रचार चालू आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी…

17 hours ago