राजकीय

अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेशाची ऑफर…

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे काँग्रेस पक्षात काहीच भावितव्य नाही. त्यांचे काँग्रेसमधील भवितव्य अंधःकारमय आहे. त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा, असा प्रस्ताव महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांना दिला आहे. काँग्रेसचा लवकरच कडेलोट होणार आहे. अशोक चव्हाण यांसारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याचे काँग्रेसमध्ये काही भविष्य नाही. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे विखे पाटील म्हणाले. त्यांनी अशोक चव्हाण यांच्यासमोर थेट भाजप प्रवेशाचा प्रस्ताव मांडला आहे. त्या प्रस्तावाला चव्हाण कशाप्रकारे प्रतिसाद देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विखे-पाटलांच्या प्रस्तावावरून राजकीय तर्क वितर्कांना उधाण आले आहे. (Ashok Chavan offered to join BJP)

अशोक चव्हाण यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी भाजपचा हा गोंधळ निर्माण करण्याचा डाव असल्याचे म्हंटले आहे. काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी ही खेळी खेळण्यात आली आहे. त्यांनी माझ्याबाबत जो आदर व्यक्त केला आहे त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. पण मलाच आता प्रश्न पडला आहे, की ते माझे मित्र आहेत का शत्रू? अशा उपरोधिक शब्दांत चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी सरकारवर विखे-पाटील यांनी
हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, “महाविकास सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते. माविआ सरकारमधील सदस्य आरोप प्रत्यारोप करण्यात मश्गुल होते. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर बजबजपुरी माजली होती. काँग्रेसच्या अधःपतनास राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करत होते. अशोक चव्हाणांसारख्या दिग्गज नेत्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे विखे-पाटील म्हणाले.

२०१९ साली राधाकृष्ण विखे-पाटील हे विरोधी पक्ष नेते होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विखे-पाटील यांनी आपला मुलगा सुजय विखे-पाटील यांना अहमदनगर मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी केली होती. पण या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला होता. त्यानंतर नाराज झालेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सुजय विखे-पाटील अहमदनगरमधून भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले होते.

हे सुद्धा वाचा

घटनाबाह्य सरकारबाबत घटनापीठाने निर्णय घ्यावा – संजय राऊत

मोदींचा मनमानी कारभार : सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

भारतातील ट्विटरच्या दोन कार्यालयांना लागणार टाळे; मस्क यांचा चिंताजनक निर्णय

 

टीम लय भारी

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

14 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

15 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

15 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

15 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

16 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

18 hours ago