राजकीय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना टोला

टीम लय भारी

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची आज १२ खासदारांसह पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी १२ खासदारांनी त्यांना पाठिंबा देत घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले. तसेच महाराष्ट्रातील आताचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे देखील सांगितले. याचवेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेल्या खासदारांना ईडी आणि सीबीआयची भीती दाखवण्यात आली आहे. असे संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे. अशी माहिती एकनाथ शिंदे यांना एका पत्रकाराकडून देण्यात आली. त्यावेळी संजय राऊत यांचा सकाळचा मॅटिनी शो बंद झाला आहे. राऊतांच्या या आरोपावर बोलण्याची गरज वाटत नाही. इतर कोणी हे बोलले असते तर दखल घेतली असती, हे इतके महत्वाचे नाही. असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी राऊतांच्या या आरोपांना उडवून लावल्याने आणि त्यांचा मॅटिनी शो बंद असल्याचे म्हटल्याने आता संजय राऊत यांवर नेमके काय उत्तर देतात, हे पाहावे लागणार आहे. कारण संजय राऊत हे सुद्धा त्यांना बोलणाऱ्यांना उत्तर देताना मागे पुढे पाहत नसल्याचेच हल्ली दिसून येत आहेत.

हे सुद्धा वाचा :

शिंदे गटाची ताकद वाढली

खासदार राहुल शेवाळेंवर आरोप करणाऱ्या महिलेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

‘शपथ पत्र’ लिहून सुद्धा शिवसैनिक पळाले शिंदे गटात

पूनम खडताळे

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

12 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

12 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

13 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

13 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

14 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

15 hours ago