राजकीय

इम्तियाज जलील यांच्या आरोपावर वळसे पाटील म्हणाले…

टीम लय भारी

मुंबई : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या मुंबईतील नियोजित सभेची जोरदार चर्चा सुरू आहे. या सभेसाठी ओवैसी मुंबईत दाखल देखील झाल्याचं सांगितलं जात असलं, तरी मुंबई पोलिसांनी मात्र त्यांच्या सभेला परवानगी दिलेली नाही. आज सकाळीच मुंबईत ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश काढण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधून मुंबईत एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली रॅली देखील येत आहे. त्यामुळे नेमकं मुंबईत आज काय घडणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे(Dilip Valse Patil said on the allegation of Imtiaz Jalil).

ओवैसींच्या सभेविषयी दिलीप वळसे पाटील यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधिंनी विचारणा केली असता त्यांनी मुंबईतील जमावबंदीबाबत माहिती दिली. “मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी जमावबंदी लागू केली आहे. त्यासोबतच मुंबईत कोणत्याही प्रकारच्या सभा, मोर्चांना बंदी घातली आहे. त्यांना आम्ही विनंती केली आहे की आपण मुंबईत ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या संदर्भात काही घटना घडल्या आहेत. त्याची काळजी घेऊन हे टाळायला हवं”, असं वळसे पाटील म्हणाले. “हा निर्णय स्थानिक पातळीवरच होईल, त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांचा निर्णय अंतिम असेल”, असं देखील दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

समीर वानखेडेंच्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण

महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याचे धमकीचे पत्र

इम्तियाज जलील यांचा दावा

दरम्यान, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी यासंदर्भात सकाळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला एमआयएम पक्षाकडून धोका असल्यामुळेच ओवैसींच्या मुंबईतील सभेला परवानगी नाकारण्यात आल्याचं ते म्हणाले होते. यासंदर्भात गृहमंतरी दिलीप वळसे पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. “एखाद्या पक्षाला धोका आहे म्हणून विरोध केला जातो हे म्हणणं बरोबर नाही. पोलीस त्यांचं कर्तव्य बजावत आहेत”, असं ते म्हणाले.

ठाकरे सरकारचे खमके पाऊल, पुढील दोन वर्षांत महाराष्ट्रात आणणार ५ लाख कोटींची गुंतवणूक

Four tehsils in Pune district record below 50% second doses, says Ajit Pawar

 महापौरांना संरक्षण दिलंय, दोषींवर कारवाई होणार

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना आलेल्या धमकीच्या पत्राबाबत देखील त्यांनी माहिती दिली. “मुंबईच्या महापौरांना अर्वाच्य भाषेत पत्र आलं आहे. त्याची सरकारने नोंद घेऊन महापौर आणि त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात आलं आहे. पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात असून त्याला शिक्षा दिली जाईल”, असं ते म्हणाले.

Team Lay Bhari

Recent Posts

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

1 hour ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

2 hours ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

1 day ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

2 days ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

2 days ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

2 days ago