टीम लय भारी
कोल्हापूर : मागील दीड वर्षापासून कोविडच्या परिस्थितीचा आपण मुकाबला करत आहोत. आज कोविडची परिस्थिती आटोक्यात आली असली तरी तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे(Thackeray government to bring big investment in Maharashtra).
कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांच्या प्रश्नांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्र सरकारने मंगळवारी 12 कंपन्यांसोबत 5 हजार कोटींहून अधिक रुपयांच्या एमओयूवर स्वाक्षरी केली. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की, एमओयूतून 9 हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. एका महाराष्ट्राने मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत एकूण 1.88 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. यातून 3.34 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या असल्याचेही सांगण्यात आलं आहे. अनेक दशकांपासून महाराष्ट्र राज्य औद्योगिकरण क्षेत्रात आघाडीवर आहे.
काँग्रेसला दूर ठेवून कोणती आघाडी होत असेल तर, हे योग्य नाही : संजय राऊत
शाळा सुरु करण्याचा निर्णय 15 डिसेंबरला राज्यस्तरावर घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
राज्याने आपल्या पायाभूत सुविधा आणि प्रगतीशील दृष्टिकोनामुळे कोरोना काळातही राज्यात औद्योगिक गुंतवणूकीचा वेग सतत वाढता ठेवला आहे, असे देसाई म्हणाले. मंगळवारी झालेल्या करारातून संरक्षण, अंतराळ संशोधन, माहिती तंत्रज्ञान, जैव-इंधन, इलेक्ट्रीक वाहन निर्मिती, निर्यात प्रधान उद्योग, अन्न प्रक्रिया, स्टील, इथेनॉल, औषध निर्माण आदी क्षेत्राला चालना मिळणार आहे.
नवाब मलिकांचे खळबळजनक ट्विट, म्हणाले…
गेल्या पाच वर्षात ३ लाख 96 हजार 585 कंपन्यांना सरकारी रेकॉर्डमधून हटवलं आहे.महाराष्ट्रामध्ये 60 कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. कराराच्या निमित्ताने राज्यात धोरणात्मक गुंतवणूकीद्वारे रोजगाराच्या संधींना बळकटी देण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना यश येत असून, त्यात सातत्य ठेवण्याचा उद्योग विभागाचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे ही राज्याला मोठा दिलासा देणारी बातमी आहे.