लयभारी टीम
औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या तिरंगा रॅलीत रविवार (26 जानेवारी) माहिती अधिकार कार्यकर्ते नदीम राणा यांच्यावर प्राणघातक हल्ला कऱण्यात. गाडीची तो़डफोड करण्यात आली. असा आरोप नदीम राणा यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
प्रजासत्ताकदिना निमित्त आज खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात औरंगाबादेत तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीत जलील यांच्या कार्यकर्त्यांनी नदीम राणा यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. खासदार इम्तियाज जलिल यांनी वक्फच्या जमिनीवर संपर्क कार्यालय बांधले असून, ती जागा वक्फची आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी पदाचा गैरवापर केला असून त्यांचे पद रद्द करावे अशी तक्रार नदीम राणी यांनी अल्पसंख्यांक
मंत्री नवाब मलीक यांच्याकडे केली होती.
नदीम राणा यांनी काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात तक्रार करुन कारवाईची मागणी केली होती. या रागातून हा हल्ला झाला असल्याचे राणा यांनी म्हटले. यावेळी खासदर इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यामुळे गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या प्रकरणी नदीम राणा यांनी पोलीसांकडे धाव घेतली.
लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…
अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…
एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…
गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…