टीम लय भारी
कणकवली : राज्यातील सत्तांतराच्या नाट्यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेली मुलाखत चांगलीच वादळी ठरत आहे. राजकारणातील आरोप – प्रत्यारोप, महाविकास आघाडीचे अपयश, मुख्यमंत्री म्हणून कारकिर्द, शिवसेनेतील बंड, एकनाथ शिंदे यांच्यावरील विश्वास, शिवसेनेचे भविष्य अशा सगळ्याच बाबतीत ठाकरे यांनी तठस्थपणे आपले म्हणणे मांडले आहे. त्यांच्या मुलाखतीला कोणी चांगला प्रतिसाद दिला तर कोणी यावर सडकून टीका केली आहे. दरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत “मातोश्री घर आवडणारच कारण शासकीय घरात राहून कर्तुत्व दाखवावं लागतं” असे म्हणून त्यांच्या कार्यकतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
निलेश राणे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करीत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष केले आहे. निलेश राणे ट्विटमध्ये लिहितात, “स्क्रिप्टेड मुलाखतीत अडीच वर्ष शासकीय निवासस्थान वर्षा येथे मुख्यमंत्री म्हणून वावर असताना उद्धव ठाकरेंना काय आठवतं तर तिथे असलेलं गुलमोहराचं आणि बदामाचं झाड. वर्षा आणि मातोश्री मध्ये तुम्हाला मातोश्री घर आवडणारच कारण शासकीय घरात राहून कर्तुत्व दाखवावं लागतं असं म्हणून टीकास्त्र सोडले आहे.”
राणे पुढे लिहितात, “उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात, असे म्हणून शिवसेनेच्या या दुटप्पी वागणुकीवर निलेश राणे यांनी बोट ठेवून शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.
हे सुद्धा वाचा…
पुण्यात दहशतवादी कृत्यांना वेग? दुसऱ्यांदा बाॅम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ
गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…
कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…
शिवसेनेकडून हेमंत गोडसे (Hemant Godse candidature ) यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे नाशिकचा…
दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन पंधऱा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक…
मोदी सरकारच्या कार्यकाळात भारताची गगनाला गवसणारी प्रगती झाली असून आज जगभरात भारताचे मान उंचावली आहे…
लोकसभेची निवडणूक ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी असून मोदी पुन्हा सत्तेत आले तर राज्यघटना बदलून…