राज्यामध्ये राम मंदिराचा मुद्दा सध्या सर्वत्र गाजत आहे. आयोध्येमध्ये भव्य दिव्य राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा २२ जानेवारी या दिवशी असून याचा उत्साह देशभरातील तरूणांमध्ये आणि प्रत्येक माणसांमध्ये पाहायला मिळेल. राम मंदिरामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. मग ते राजकीय नेत्यांच्या निमंत्रणाची चर्चा असो की आणखी काही. अशातच आता आणखी एक मुद्दा गेली दोन दिवसांपासून गाजत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ३ जानेवारी दिवशी शिर्डी येथे पक्षाच्या सभेमध्ये बोलत असताना राम बहुजनांचे आहेत, ते मांसाहारी असल्याचं वक्तव्य केलं, यावर आता भाजप आणि अजित पवार गट आक्रमक झाला आहे. एवढंच नाही तर आता आयोध्येतील एका महाराजांनी जितेंद्र आव्हाड समोर आल्यावर समाज वध करतील असं उत्तर दिलं. यामुळे आणखी हा मुद्दा तापला जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘तर त्यांचा वध करणार’
जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा ही आता थेट आयोध्येला गेली आहे. यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आयोध्येतील परमहंस महाराज यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, ‘संत समाज जितेंद्र आव्हाड यांना माफ करणार नाही. ते जर पुढं आले तर समाज त्यांना सोडणार नाही, त्यांचा वध करणार’ असल्याचं परमहंस महाराज म्हणाले आहेत.
हे ही वाचा
अमिर खानची लेक अडकली लग्नबंधनात, कोर्ट मॅरेज करत दिली माहिती
‘आपल्या काकाला म्हणजेच बापाला घराच्या बाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत’
‘शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा’
‘आव्हाडांवर कारवाई करा’
परमहंस महाराज हे जितेंद्र आव्हाड यांच्यावर संतापले आहेत. ‘जितेंद्र आव्हाड यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी. असं मी केंद्र आणि राज्य सरकारला आवाहन करत आहे. जर असं झालं नाही तर त्या व्यक्तीचा वध केला जाईल. श्रीरामाबद्दल कोणी अपमान केल्यास त्याला सोडलं जाणार नाही, असं वक्तव्य आता परमहंस महाराज यांनी केलं आहे.
सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…
आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…
स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…
भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…
कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…
डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…