राजकीय

Politics : पार्थ पवारांची वाटचाल ‘सत्यमेव जयते’च्या दिशेने : चंद्रकांत पाटील

टीम लय भारी

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी गेल्या काही दिवसांत घेतलेल्या भूमिका पाहता, ते (Politics) आतल्या आवाजाला महत्त्व देत आहेत. पार्थ पवार यांची वाटचाल ‘सत्यमेव जयते’च्या दिशेने सुरू आहे, (Parth Pawar’s journey towards ‘Satyamev Jayate’ says Chandrakant Patil) असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

पार्थ पवार यांनी सुशांतसिंह रजपूत आत्महत्या प्रकरण आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत राजकारण आणि पक्षनिष्ठा अशी राजकीय मते व्यक्त न करता स्वत:ची ठोस भूमिका बेडरपणे व्यक्त केली आहे. त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपला ठाकरे सरकारवर निशाणा साधण्याची संधी मिळाली.

बीडमधील विवेक रहाडे या युवकाने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केली. त्यावर उद्विग्न होऊन पार्थ पवार यांनी ट्विट केले आहे. मराठा नेत्यांनी वेळीच जागे होऊन आरक्षण मिळविण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. राज्य सरकारने हा गुंता सोडविण्यासाठी तातडीने पाऊले उचलली पाहिजेत, अशी मागणी पार्थ यांनी केली आहे. विवेक यांनी आमच्या मनात पेटवलेली ज्योत व्यवस्थेला पेटवेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

त्याबाबत विचारणा केली असता पाटील यांनी पार्थ पवार हे ‘सत्यमेव जयते’च्या मार्गावर असल्याचे मत व्यक्त केले. पार्थ पवार यांनी यापूर्वीही सुशांतसिंह रजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी केली होती. त्यामुळे ते आतल्या आवाजाला अधिक महत्त्व देतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

पुण्यात खासदार गिरीश बापट व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी अभियानाला गुरुवारी सुरूवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, पार्थ पवार यांची सत्यमेव जयतेकडे वाटचाल सुरू आहे. पण याचवेळी पार्थ यांच्या भाजप प्रवेशावर असा कुठलाही प्रस्ताव अजूनतरी आलेला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच मराठा आरक्षणाचा अध्यादेश केंद्राला काढता येणे कदापि शक्य नाही. आरक्षण हा राज्याचा विषय आहे. ही बाब इतकी वर्ष राजकारणात सक्रिय असणा-या शरद पवारांना माहिती नाही का? असा सवाल उपस्थित करत पाटील यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले. तर दुसरीकडे भाजप प्रवक्ते व आमदार राम कदम यांनी देखील पार्थ यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. तसेच पार्थ यांच्या मागणीची राज्य सरकार यावेळी तरी गंभीर दखल घेणार की पुन्हा कवडीची किंमत देणार? असा खोचक प्रश्न विचारत महाविकास आघाडीवर टीका केली.

अभिषेक सावंत

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

10 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

12 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

13 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

14 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

14 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

15 hours ago