द न्यूयॉर्क टाईम्समधील अहवालानुसार, इस्रायली स्पायवेअर पेगासस आणि एक क्षेपणास्त्र प्रणाली 2017 मध्ये भारत आणि इस्रायल यांच्यात अत्याधुनिक शस्त्रे आणि गुप्तचर उपकरणांच्या अंदाजे USD 2-बिलियनच्या कराराचे “केंद्रबिंदू” होते. केंद्रावर टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला की, मोदी सरकारने आपल्या लोकशाहीच्या प्राथमिक संस्था, नेते आणि जनतेची हेरगिरी करण्यासाठी पेगासस विकत घेतले.
हे सुद्धा वाचा
राहुल गांधी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात परदेश दौऱ्यावरून भारतात परत येण्याची शक्यता
महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरण काँग्रेस खपवून घेणार नाही :नाना पटोले
बाळासाहेब थोरात म्हणाले, महाविकास आघाडीने भाजपला मागे टाकले !
Rift in MVA? 28 Congress corporators join NCP in Maharashtra’s Malegaon
“फोन टॅप करून त्यांनी सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, लष्कर, न्यायपालिका या सर्वांना लक्ष्य केले आहे. हा देशद्रोह आहे,” असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. “मोदी सरकारने देशद्रोह केला आहे,” असा आरोप त्यांनी हिंदीतून केलेल्या ट्विटमध्ये केला आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही ट्विट केलं आहे. मोदी सरकारने भारताच्या शत्रू सारखं काम का केलं? भारतीय नागरिकांच्या विरोधातच युद्धाच्या शस्त्रांचा वापर का केला? पेगाससचा वापर बेकायदेशीरपणे हेरगिरी करण्यासाठी करणं हा राष्ट्रद्रोह आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. सर्वांना न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे, असं खरगे यांनी म्हटलं आहे.
मोदी सरकारने न्यूयॉर्क टाइम्सच्या खुलाशावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे. इस्रायलची कंपनी एनएसओने 300 कोटीला पेगाससची विक्री केली. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालय आणि संसदेची दिशाभूल केल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसून येते. हे वॉटरगेट आहे का? असा सवाल भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…