राजकीय

एकनाथ शिंदे यांनी जिंकली सामान्य जनतेची मने !

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत बुधवारी दरड कोसळली. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खालापूरजवळ असणाऱ्या इर्शाळगडाजवळ रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास ही दरड कोसळली. यामध्ये गडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी मधील अनेक घरे जमीनदोस्त झाली. या दुर्घटनेत 16 जणांना आपला जीव गमावला. ह्या वाडीपर्यंत पोहण्यासाठीचा रस्ता खूप कठीण असून पावसाळ्यात या रस्त्याने प्रवास करण खूपच कठीण होत.  तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: या ठिकाणावर जाऊन सर्व पाहणी करण्याचा निर्णय घेतला. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या घटनेची माहिती त्यांना जागेवर बसून मिळणं सहज शक्य होत. पण तरीही त्या ठिकाणी जायचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे प्रशासनाच्या बचाव कार्याला वेग आला. मुख्यमंत्र्यांच्या या वागण्यामुळे त्यांनी सामान्य जनतेची मने जिंकली आहेत.

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी हे डोंगराच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे.  पण इथे जाण्याचा रस्ता हा अरुंद व निसरडा आहे. त्यामुळे या ठिकाणी पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच सतत सुरू असणारा पाऊस त्यामुळे कोणतीही वाहने त्या ठिकाणी घेऊन जाणे अशक्य आहे. मुख्यमंत्र्यांची गाडी तिथे पोहचू शकत नव्हती. पण तरीही दुर्घटना घडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भर पावसात इर्शाळवाडीपर्यंत चालत जाण्याचा निर्णय घेतला. वाडीमध्ये पोहचून त्यांनी तेथील सर्व चौकशी करत स्थानिक लोकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

हे सुद्धा वाचा:

सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या ओपीडीत ७० टक्के रुग्ण घटले

उदय सामंतांनी मांडले विधेयक, उद्योगवाढीसाठी खमके धोरण !

मुंबईत 22,483 कुटूंबे धोकादायक स्थितीत; 12 वर्षांपासून दरडी कोसळण्याच्या दुर्घटनांवर उपाययोजना नाही

या आधीही एकनाथ शिंदे यांनी या अशा अनेक घटनास्थळी प्रत्यक्ष भेटी दिल्या आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी नेहमी लोकांपर्यंत जाऊन काम केले आहे. मग तो बुलढाणा बस अपघात असो  किंवा 2019 पुराच्या पाण्यात अडकलेली महालक्ष्मी एक्सप्रेस एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक वेळी त्यांचे काम जबाबदारीने पार पाडले आहे.

 

मोनाली निचिते

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

5 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

6 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

8 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

8 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

9 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

9 hours ago