राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल काँग्रेसच्या तीन दिगग्ज नेत्यांनी भेट घेतली आहे. तब्बल अर्धा तास या नेत्यांनी पवारांशी चर्चा केली. या बैठकीत ओबीसींच्या आरक्षणावर चर्चा झाली. त्यानंतर राज्य सरकारचा कारभार आणि एकूण तीन पक्षांतील वादावर चर्चा झाली. त्याचवेळी पवारांनी एक महत्त्वाचा प्रश्न या तिन्ही काँग्रेसच्या नेत्यांना केला. तुम्ही खरंच एकटं लढणार आहात का? तसं स्पष्ट सांगा. नाना पटोलेंना दिल्ली हायकमांडने काही अधिकार दिले आहेत का?, असा प्रश्न पवारांनी या तिन्ही नेत्यांना केला असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
नागपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात गावकऱ्याचा बळी
‘2022 पासून सर्व सरकारी वाहने विजेवर चालणारी असतील’, आदित्य ठाकरे
काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. या चारही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास ही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एमपीएससीची 817 जागांची मागणी, महाविकास आघाडी सरकारने दिल्या फक्त इतक्या जागा…
Sharad Pawar right candidate to take on PM Modi in 2024 elections, says Sanjay Raut
या चर्चेबाबत काय म्हणाले माणिकराव ठाकरे
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार आहे. देशाचे काँग्रेसचे प्रभारी जेव्हा राज्यात येतात तेव्हा ते मित्र पक्षांच्या नेत्यांच्याही गाठीभेटी घेत असतात. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते त्यांना भेटले. या भेटीत ओबीसींच्या प्रश्नावर चर्चा झाली. त्यावेळी इतर विषयही निघाले असतील, ते स्वाभाविक आहे.
पटोले आणि पवार साहेबांशी संबंधित विषयांवरही चर्चा झाली आहे. असे सांगतानाच युती, आघाडी करायचा निर्णय पक्ष नेतृत्व घेत असते. त्यामुळे पवार असा प्रश्न विचारतील असे वाटत नाही. आघाडीचा निर्णय हा नेहमीच अंतिम टप्प्यावर होत असतो. 2014 मध्येही अंतिम टप्प्यावर निर्णय झाला होता. त्यावेळी आम्ही वेगळे लढलो होतो. त्याआधीही तसेच झाले होते. असे काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…
व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…
त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…
आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…