टीम लय भारी
मुंबई : माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. विधान परिषदेच्या रणसंग्रामामध्ये अखेर सत्ताधारी महाविकास आघाडीने विजयाचा झेंडा फडकावून, पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी ठाकरे सरकारच्या बाजूने कौल दिला. राज्यातील सहापैकी चार जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले असून, भाजपचे बालेकिल्ले ढासळले आहेत. त्याचवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘हा निकाल म्हणजे वाचाळवीरांना चपराक’ अशी प्रतिक्रिया दिली होती.
ट्विट करत नीलेश राणे म्हणाले, “वाह अजितदादा वाह!! ज्यांना चपराक बसली म्हणताय, त्यांच्याबरोबर एक वर्षापूर्वी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ तुम्ही घेतली होती हे विसरलात का? कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा शिल्लक राहिली आहे का,” अशा शब्दांत राणे यांनी अजित पवारांचा खरपूस समाचार घेतला आहे.
काय म्हटले होते अजित पवारांनी?
नागपूर आणि पुण्यात ब-याच वर्षांपासून पदवीधर मतदारसंघामध्ये एका पक्षाची मक्तेदारी होती. मात्र, सुशिक्षित पदवीधर, शिक्षक मतदार महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे हे सिद्ध झालं. बरेच जण वाचाळ बडबड करत होते. मी त्यांची नावे घेऊन कारण नसताना वेळ घालवू इच्छित नाही. पण हा निकाल म्हणजे त्या वाचाळवीरांना ही फार जबरदस्त चपराक बसलेली आहे. आता लोकांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे, असे अजित पवार म्हणाले होते.
शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…
जुने नाशिक येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…
वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…
मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…
भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…