उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना धू धू धुतले !

लोकसभा निवडणूक (Loksabha election) कार्यक्रम जाहीर होण्यासाठी काही तास उरले आहेत. राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार निवडणून आणण्यासाठी कंबर कसत आहे. राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत (Arvind Sawant)यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यांना पुन्हा चांगल्या मतांनी निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)हे भाजपचे उमेदवार असले आणि प्रचाराला आल्यास त्यांना खरी शिवसेना कोणती, असा प्रश्न विचारा असं आव्हान ठाकरे यांनी मतदारांना केलं आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून (Loksabha election)अरविंद सावंत(Arvind Sawant) यांना उमेदवारी जाहिर केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली.

‘शेवटच्या घटकाकडूनही गजर घडाळ्याचाच….’ सुनेत्रा पवारांची ‘ती’ फेसबुक पोस्ट चर्चेत

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात आपल्या विरुद्ध उभे राहणारे आपल्यात होते, त्यानंतरत राष्ट्रवादीत गेले अन् आता भाजपमध्ये आहेत. त्यापुढे आता आणखी कुठे तरी जातील. आता तुमच्या वस्तित जेव्हा फिरायला येतील तेव्हा तुम्ही सांगायला हव त्यांना की, शिवसेना कोणाची?

…तर 14 हजार कोटी कुठे गेले? इलेक्टोरल बॉण्डवर अमित शहांचा प्रश्न

ज्या शिवसेना प्रमुखांनी आणि माझ्या आजोबांनी दिलेलं नावं या चोरांनी बंद दाराआड कुणालाही न विचारता आपण सादर केलेल पुरावे बाजूला सारून शिवसेना गद्दारांच्या हातात दिली. आता हे जिथ जिथं उमेदवार म्हणून फिरतील त्यांना शिवसेना कोणाची सांग असा सवाल उपस्थित करा आणि माहिती नसेल तर आम्ही तुमचे डिपॉझिट जप्त करुन सांगू की शिवसेना कोणाची? अरविंद सावंत यांना पून्हा निवडून देऊ. असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील लढत प्रतिष्ठेची होणार आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्याकडून अरविंद सावंत यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मैदानात उतरणार आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि भाजपकडून मराठी आणि कोकणी मते स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे वारंवार लालबाग-परेल मध्ये बैठका घेत आहेत. तर राहुल नार्वेकर शेवटच्या टप्प्यात लालबाग परेल शिवडी वरळी मधील रखडलेली कामे मार्गी लावत आहेत.

धनश्री ओतारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago