जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांनी आनंद व्यक्त करत भाजपवर(BJP) तोफ डागली. तसेच, मला एका भावाने दगा दिला तरी दुसरा भाऊ म्हणजे शिवसेना माझ्याबरोबर आहे आणि याचा मला आनंद आहे. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.(Unmesh Patil Joins Shiv Sena Thackeray criticized on bjp)
पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत कमळाची साथ सोडत ठाकरे गटाची मशाल हाती घेतली. पक्षप्रवेशावेळी उन्मेश पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राहुल गांधींनी ‘त्या’ वाहनांचं लाखो रुपयांचं तटवलं भाडं; नेमकं प्रकरण काय?
काय म्हणाले उन्मेश पाटील?
आम्हाला बदल्याचं नव्हे तर बदलाचं राजकारण हवं आहे. पद महत्वाचं नाही. परंतु, आमची अवहेलना करण्यात आली, मला मानसन्मान नको, कार्यकर्त्याची अवहेलना होते तेव्हा तो घुसमटतो. राज्यात विकासाऐवजी विनाशाची, बदलाऐवजी बदल्याची भावना रुजवली जात आहे. परंतु, मला त्या पापातला वाटेकरी व्हायचं नाही. असा टीकास्त्र सोडत आमचा स्वाभिमान जपला जात नसेल, बैठकीला बोलावलं जात नसेल, तर स्वाभिमान गहाण ठेवण्याऐवजी मी या लढाईत सहभागी व्हायचं ठरवलं आहे. क्रांतीची मशाल पेटवायचं ठरवलं असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.
मी पदासाठी किंवा खासदार होण्यासाठी इथे आलो नाही. उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलं आहे की, जळगावात शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे. माझ्यासह सर्व सहकारी जळगावात मशाल पेटवू. अशा शब्द पाटील यांनी दिला. मला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना शिवसेनेनं सामावून घेतलं आहे. त्याबद्दल मी उद्धव ठाकरेंचे आभार मानतो. अशी भावना व्यक्त केली.
निवडणुक आयोगानं शरद पवार गटाचं केलं कौतुक; नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवत, भारताला मराठी बाणा दाखवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आज मी प्रवेश करत आहे. मी भाजपा सोडून ठाकरे गटात प्रवेश करत असल्याने मला अनेकजण विचारत आहेत की, उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही नाराज आहात का? मी या सर्वांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, राजकारण करताना आमदार, खासदार होणं हे एवढंच माझं ध्येय नव्हतं.
मी खूप चांगल्या हेतूने काम करत होतो. परंतु, राजकारणात काम करताना, आमदार असताना आज आपण जी शासकीय योजनांची जत्रा पाहतोय, त्याचा पॅटर्न आम्ही चाळीसगावात राबवला होता. दुर्दैवाने त्याला किंमत मिळाली नाही. मी मागणी न करता मला मागील वेळेस लोकसभा उमेदवारी मिळाली. परंतु, यावेळी मला एका भावाने दगा दिला तरी दुसरा भाऊ म्हणजे शिवसेना माझ्याबरोबर आहे आणि याचा मला आनंद आहे. असं पाटील यावेळी म्हणाले.
सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…
आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…
स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…
भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…
कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…
डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…