मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेच्या वेळी सर्व्हर डाउन नव्हता तर नियोजनबद्ध सायबर हल्ला (Cyber attack) करण्यात आला होता असा आरोप उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कोल्हापुरात केला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेवेळी सर्व्हर डाऊन झाला नव्हता. तर तो सायबर हल्ला (Cyber attack) होता असा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे,अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
मुंबई विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा ऑनलाईन होत असतानासर्व्हर मध्ये बिघाड झाल्याचे समोर आले होते. या मुद्याकडे लक्ष वेधल्यावर मंत्री सामंत यांनी सांगितले की,’ याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू आणि सायबर विभाग प्रमुख रश्मी करंदीकर यांच्याशी चर्चा झाली आहे.
कुलगुरूंनी दिलेल्या प्राथमिक अहवालामध्ये सायबर प्रणाली उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता असे नमूद केले आहे. हा सायबर हल्ला (Cyber attack) आहे. याबाबतची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली असून कालपासून त्याची चौकशी सुरू झाली आहे.
ऑनलाइन शिक्षणाचा कसलाही गोंधळ नाही. काहीजण मुद्दाम घोळ घालत आहेत. ही ऑनलाईन परीक्षा ९ हजार विद्यार्थी देत होते. मात्र एकाच वेळी अडीच लाख विद्यार्थ्यांकडून त्याची लिंक ओपन केली जात असल्याचे दिसले आहे. याचा अर्थ ही यंत्रणा ठप्प होण्यासाठी जाणीवपूर्वक केलेला हा प्रयत्न आहे. तपासातून यातील वस्तुस्थिती पुढे येईल, असेही सामंत यांनी नमूद केले.
जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…
अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…
गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…
गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…
नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…
चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…