लय भारी न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राज्यात देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील अनपेक्षित सरकार शनिवारी सत्तेत आले. या सरकारचे अभिनंदन करण्याबरोबरच विरोधकांवर हल्लाबोल करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते विधी व न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद तावातावाने बोलू लागले. परंतु शब्दांचे बाण सोडत असताना शिवाजी महाराजांचा त्यांनी ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केला. त्यांनी दोन वेळा एकेरी उल्लेख केला. चुकतोय असे लक्षात येताच त्यांनी तिसऱ्या वेळी छत्रपती शिवाजी अशी दुरूस्ती केली. रवीशंकर यांच्या या ‘शहाणपणा’बद्दल भाजपचे खासदार व शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी महाराज यांनी लेखी पत्रच काढून संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट सुद्धा केले आहे.
खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी पत्रात म्हटले आहे की, आपण एक जबाबदार मंत्री आहात. पण आपण पत्रकार परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख शिवाजी, शिवाजी असा केला. यामुळे महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या भावनांना ठेच पोचली आहे. महाराजांच्या नावाचा उल्लेख कसा करावा हे आपल्याला माहित असायला हवे. सध्याचे राजकारण व राजकीय नेत्यांशी छत्रपती शिवाजी महाराजांचा व त्यांच्या विचारांचा काहीही संबंध नाही. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनीही या पद्धतीची चूक केली होती. त्यांनाही लोकांनी माफी मागण्यासाठी मजबूर केले होते. त्यांनी माफी मागून शिवभक्तांचा आदर केला होता. तुम्हीही माफी मागून शिवभक्तांच्या भावनांचा आदर करावा, अशी मागणी खासदार संभाजी महाराज यांनी या पत्राद्वारे केली. हा सगळा संताप त्यांनी ट्विटवरसुद्धा व्यक्त केला आहे.
संभाजी महाराजांच्या ट्विटनंतर रवी शंकर प्रसाद यांनी लगोलग संभाजी महाराजांना फोन केला, व माझ्याकडून अनावधानाने एकेरी उल्लेख झाल्याचे सांगितले. प्रसाद यांनी ट्विटरवर संभाजी महाराजांना प्रत्यूत्तर देत माफी मागत असल्याचेही नमूद केले. प्रसाद यांनी केलेल्या माफिनाम्यानंतर खासदार संभाजी महाराज यांनी या प्रकरणी नमती भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
शिवाजी महाराजांचा आदरयुक्त उल्लेख कसा करावा याबाबत कायदा करण्याबाबत संभाजी महाराज यांनी रवीशंकर प्रसाद यांच्याकडे मागणी केली. त्यावर प्रसाद यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे संभाजी महाराजांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
हे सुद्धा वाचा
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…
आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…
लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…
पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…