सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा सन 2021- 22 या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ हे होते.
शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, काय चाललंय देशात?’, शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
‘रामायण’मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचं निधन
व्यासपीठावर बाजीराव पा. खेमनर, सौ दुर्गाताई तांबे, लक्ष्मणराव कुटे, अमित पंडित, उपाध्यक्ष संतोष हासे ,सभापती सौ सुनंदाताई जोर्वेकर ,उपसभापती नवनाथ अरगडे ,रामहरी कातोरे, साहेबराव गडाख, सुभाष सांगळे, गणपतराव सांगळे, सुरेश झावरे, सौ. मीराताई शेटे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते .याप्रसंगी चंद्रकांत कडलग व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वैशालीताई कडलग, भाऊसाहेब शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ पुष्पाताई शिंदे, मीनानाथ वर्पे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ हिराताई वर्पे ,माणिकराव यादव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ लताताई यादव, संभाजीराव वाकचौरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सिंधुताई वाकचौरे यांच्या हस्ते बॉयलरची विधिवत पूजा झाली.
यावेळी बोलताना आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की ,सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावरील या सहकाराची वाटचाल सुरू आहे. कारखान्याचे व्यवस्थापन अतिशय उत्तम आहे. नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने घेतलेल्या नवीन कारखान्याचा निर्णय अत्यंत धोरणात्मक व दूरदृष्टीचा ठरला आहे. यातून पुढील पन्नास वर्षांचे नियोजन झाले असून या कारखान्याने आपल्या गुणवत्तेतून सभासदांचा व ऊस उत्पादकांचा मोठा विश्वास राखला आहे .साखर कारखानदारी अडचणीत असताना सुद्धा थोरात कारखान्याने आपल्या लौकिकका प्रमाणे शेतकऱ्यांना सर्वोत्तम भाव दिला आहे. विज निर्मितीचा घेतलेला निर्णय हा अत्यंत फायदेशीर ठरला आहे. संगमनेरचा सहकार व तालुक्याच्या विविध घटनांचा ना. थोरात दैनंदिन आढावा घेत असून तालुक्यातील जन माणसाच्या विकासासाठी अविरत पणे झटणारे त्यांचे नेतृत्व राज्यासाठी अभिमानास्पद काम करत आहे.
निळवंडे धरण नामदार थोरात यांनी पूर्ण केले असून कालव्यांच्या कामाला अत्यंत गती दिली आहे. दुष्काळी भागाला पाणी हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास असल्याचे आमदार डॉ. तांबे यांनी म्हटले आहे.
तर सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, संगमनेरचा सहकार हा देशाला दिशादर्शक आहे. नामदार बाळासाहेब थोरात हे राज्यभर काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करत असून त्यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने ई पीक पाहणी, डिजिटल
सातबारा घरपोच असे विविध उपक्रम हाती घेतले आहे .राज्यात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असताना सुद्धा प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होत असून सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी काम करत असल्याचेही त्या म्हणाल्या.
निलेश राणेंचे आदित्य ठाकरेंवर आरोप
Lockdown-like curbs imposed in 61 villages in Ahmednagar as Covid cases surge
याप्रसंगी कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, संपतराव गोडगे, भास्करराव आरोटे, डॉ. तुषार दिघे, दादासाहेब कुटे, विनोद हासे, अनिल काळे, सौ मंदाताई वाघ, श्रीमती मीराताई वर्पे, रामदास वाघ, प्रा. बाबा खरात, सुभाष पा. गुंजाळ, शिवाजी जगताप, रामनाथ कु-हे, तात्याराम कुटे, कामगार संचालक केशव दिघे, राजेंद्र कढणे, शंकर ढमक ,भास्कर पानसरे, नवनाथ गडाख, रामदास तांबडे, किरण कानवडे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर ना. थोरात यांनी त्वरित कालव्यांच्या कामाला गती दिली. आता काही पुढारी टीका करतात त्यांना कालव्यांच्या कामाची गती पहावत नाही. त्यांच्या बातम्या पहा कधी ते म्हणतात सत्तेसाठी काँग्रेसला लाचार आहे. आता लाचार कोण आहे ही जनता ठरवते आहे. नामदार थोरात यांच्या कामावर जनतेचा मोठा विश्वास असल्याने कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने निळवंडे बाबदचे फ्लेक्स लावले आहे. त्यामुळे इतरांनी काळजी करू नये. आपण काय योगदान दिले याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे असा टोला त्यांनी लगावला.
-कार्यकर्त्यानी आत्मविश्वासाने फ्लेक्स लावले : इतरांनी काळजी करू नये – ओहोळ
शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…
जुने नाशिक येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…
वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…
मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…
भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…