टॉप न्यूज

शरद पवारांकडून विजयसिंह मोहिते पाटलांना ‘डोस’

टीम लय भारी

मुंबई : विजयसिंह मोहिते पाटील यांच्या बहुतांश सहकारी संस्था रसातळाला गेल्या आहेत. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना शेवटच्या गटांगळ्या खात आहे. आता या संस्थेला वाचविण्यासाठी शरद पवार यांनी ‘डोस’ द्यायला सुरूवात केली आहे ( Sharad Pawar taken action for Vijaysinh Mohite Patil).

सहकारी संस्था, साखर कारखाने वाचले पाहीजेत, अशी शरद पवार यांची आग्रही भूमिका असते. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विविध सहकारी संस्थांचे माळशिरस, अकलूज व सोलापूरमध्ये मोठे जाळे होते. पण अंधाधूंद कारभारामुळे सगळ्या संस्थांची वाताहत झाली आहे. सहकारमहर्षी साखर कारखाचीही दयनीय स्थिती आहे. हा कारखाना वाचावा म्हणून प्रादेशिक साखर सहसंचालकांकरवी पवार यांनी ‘डोस’ द्यायला सुरूवात केली आहे.

साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. कारखान्याने अन्य दोन कारखान्यांना दिलेल्या पाच कोटी रूपयांच्या वसुलीचेही आदेश सहसंचालकांनी दिले आहेत. संचालक मंडळाच्या मनमानी कारभाराला चाप लावून कारखाना सुरळीत करण्यासाठी खुद्द शरद पवार यांनीच प्रयत्न सुरू केल्याचे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

हे सुद्धा वाचा

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला ‘कोरोना’ची लागण, आतापर्यंत 7 मंत्री ‘कोरोना’बाधित

बाळासाहेब थोरातांचे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, नऊ कोरोनाबाधित प्रकरणाचा अहवाल पाठवा

देवेंद्र फडणविसांचे बोलून झाले, अन् अजितदादांनी फवारा मारला

अजितदादा म्हणाले, जयंत पाटील माझ्यावर कारवाई करतील

‘महाविकास आघाडी’चे ४५ आमदार फुटीच्या मार्गावर

पतसंस्थेच्या २०० कोटींच्या ठेवींमध्ये अफरातफर

मोहिते पाटील यांच्या सुमित्रा पतसंस्थेमध्ये सर्वसामान्य लोकांच्या तब्बल २०० कोटींच्या ठेवी होत्या. या ठेवी परत मिळाल्या नसल्याने हजारो ठेवीदार हवालदील झाले. सहा जणांनी आत्महत्या केल्या. एक जणाने तर जिल्हाधिकारी कार्यालयातच रॉकेल ओतून आत्महत्या केली होती. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी मोहिते पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावण्यात आले होते.

मोहिते पाटील यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभय मिळाले होते. पुढे मोहिते पाटील पिता पुत्रांनी भाजपमध्येच प्रवेश केला.

साखर कारखान्यांची विल्हेवाट

शिवराज व विजय या दोन्ही साखर कारखान्यांची यापूर्वीच मोहिते पाटील यांनी विक्री केली आहे. एफआरपीनुसार शेतकऱ्यांची बिले दिलेले नाहीत. उसतोडणीचे पैसे दिलेले नाहीत. कामगारांचे पगार दोन वर्षांपासून दिलेले नाहीत. संगनमत करून एका संस्थेकडून दुसऱ्या संस्थेत कोट्यावधी रूपये हस्तांतरीत केले आहेत. असे ‘नको ते उद्योग’ मोहिते पाटील यांनी करून ठेवले आहेत. या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील घराण्यातील शेवटचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील हा एकमेव कारखाना वाचविण्यासाठी पवार यांनी पाऊले उचलली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा 

तुषार खरात

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

11 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

12 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

12 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

13 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

13 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

15 hours ago