राज्यात टीईटी अर्थात शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटातील मोठे नेते अब्दुल सत्तार यांची नावे समोर आली आहेत. या शिक्षक भरतीची परीक्षा पास करण्यासाठी अब्दुल सत्तार यांच्या मुलींनी एजंटला पैसे दिल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी विरोधकांनी अब्दुल सत्तार यांची चौकशी करण्याचे मागणी केली आहे. सदर प्रकरणात अजित पवार यांच्या मुलींची नावे असल्याचे उघड झाल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली. आता नव्या मंत्री मंडळात अब्दुल सत्तार हेच शिक्षणमंत्री असे टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. दरम्यान, याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारले असता, सदर प्रकरणाबाबत पावसाळी अधिवेशनात बोलेल असे त्यांनी सांगितले.
पण टीईटी घोटाळा प्रकरण ईडी कडे चौकशीसाठी देणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, याबाबत अजित पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांची बाजू घेतली. ईडी, एनआयए या संस्था केंद्राच्या अधिपत्याखाली चालतात. पण काहीवेळेस फक्त सीबीआयला राज्य सरकारला विचारल्याशिवाय चौकशी करता येत नाही. असेही यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…
शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…
पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…