राज्यात राजकारणाने वेगळेच वळण घेण्यास सुरूवात केली आहे. सत्ताधारी भाजप विरोधकांच्या मुळाशी उठली असून एकेका विरोधकांच्या घोटाळ्याची यादीच आता बाहेर काढून त्यांना संपवण्याचा प्रयत्न करू लागली आहे. यामध्ये भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya’s) यांनी विरोधकांचे पितळ उघडे पाडण्याचे मनावरच घेतले आहे. संजय राऊत, अनिल परब यांच्या नंतर सोमय्या यांनी काँग्रेस नेते असलम शेख यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. महाविकास आघाडीत मस्त्य खाते असणाऱ्या शेख यांचा १००० कोटी रुपयांचा स्टुडिओ घोटाळा प्रकरण त्यांनी लावून धरले आहे.दरम्यान, पर्यटन खात्याकडून सुद्धा शेख यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
त्यामुळे असलम शेख यांच्यावरील कारवाई अटळ आहे असे सोम्मया यांचे म्हणणे आहे. इतकचं काय त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणीच त्यांनी केली आहे.
स्टुडिओ घोटाळा प्रकरणाने डोकं वर काढल्याने शेख यांनी तात्काळ देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली परंतु या भेटीतून काहीच निष्कर्ष झाला नाही, उलट कारवाईचा धोका शेख यांचे दार जोरजोरात बडवू लागली आहे. या प्रकरणानंतर आणखी कोणाकोणाचा नंबर लागणार आणि शिक्षा होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला असून घोटाळ्यातील आरोपी भाजपचा सहारा घेणार का असा प्रश्नच आता उपस्थित होऊ लागला आहे.
शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी (Chemical-rich…
शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली…
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेच्या…
घर भाडेकरूंचा (Tenant dispute) प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मखमलाबाद रोडवरील एका रहिवासी इमारतीमध्ये घरमालकांनी…
ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नाशिक शहरात स्टिंग ऑपरेशन राबवत घरगुती गॅस सिलेंडरच्या (gas…
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी १३ राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांमध्ये रात्री साडे दहा …