व्हिडीओ

Video : प्रदीप पटवर्धन एक ‘दिलखुलास व्यक्तिमत्व’

मराठी मनोरंजन क्षेत्रातील हरहुन्नरी अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचे (ता. ९ ऑगस्ट) सकाळी हृदयविकाराने निधन झाले. वयाच्या ६५ व्या वर्षी प्रदीप पटवर्धन यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप पटवर्धन यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. तर त्यांच्या चाहत्यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. प्रदीप पटवर्धन यांना रंगभूमीवरील ‘मोरुची मावशी’ या नाटकाने एक वेगळी ओळख निर्माण करून दिली.मोरुची मावशी या नाटकाने दीड हजारांपेक्षा अधिक प्रयोग केले आणि ते सर्व प्रयोग हाऊसफुल्ल ठरले.

प्रदीप पटवर्धन यांच्या आई उषा पटवर्धन या स्वतः रंगभूमीवरील कलाकार असल्याने प्रदीप यांना लहानपणापासूनच अभिनयाची देणगी मिळाली होती.प्रदीप पटवर्धन हे रंगभूमीवर गाजत असतानाच त्यांनी आर्थिक बाजू भक्कम करणारी नोकरी करावी, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. म्हणूनच प्रदीप त्यांना मिळेल ते काम करून पैसे कमवायचे. अशाच वेळी त्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेत नोकरी मिळाली. रिझर्व्ह बँक इंडियामध्ये नोकरी करत असतानाच त्यांनी नाटकाच्या अंतर बँक स्पर्धेत भाग घेतला आणि पुरस्कार सुद्धा पटकावला.हा किस्सा स्वतः प्रदीप पटवर्धन यांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितला होता. परंतु नोकरी जाऊन सुद्धा प्रदीप हे नाटकामध्येच काम करत राहिले.

नाटकात काम करत असताना एक दिवस प्रदीप पटवर्धन अभिनेते अमोल पालेकर यांच्या नजरेत आले. यानंतर अभिनेते अमोल पालेकर यांनी प्रदीप यांची विचारपूस केली आणि अमोल पालेकर यांच्या मदतीनेच ते पुन्हा एकदा बँक ऑफ इंडियामध्ये कामावर रुजू झाले. यावेळी मात्र नाटकात काम करण्याने नाराज असलेल्या प्रदीप यांच्या आई उषा पटवर्धन यांनी तू कामासोबत नाटकातही काम कर, असा आत्मविश्वास दिला.

नवेली कांबळे

Naveli Kamble is a reporter/ sub editor.

Recent Posts

काँग्रेसने पंतप्रधान मोदींना विचारले हे सवाल

आज पंतप्रधान मराठवाड्यात येत आहेत आमचे काही त्यांना प्रश्न: 1. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या  झालेल्या दुरवस्थेकडे पंतप्रधानांचे…

44 seconds ago

नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कांद्यावर बोलणार? १० मे रोजी पिंपळगावला सभा

कांदा (onions) काढणीचे काम वेगात सुरू झाले असताना व्यापारी, हमाल मापाडी व बाजार समित्यांच्या वादात…

14 hours ago

वर्षातून दोनदा होणार बोर्डाच्या परीक्षा

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून वर्षातून दोनदा बोर्डाच्या परीक्षा (Board exams) घेण्यासाठी ‘लॉजिस्टिक्स्‌’वर काम करावे, यासंदर्भात…

17 hours ago

विठ्ठला तूच’ या चित्रपटाच्या, ट्रेलरने वाढविली प्रेक्षकांची उत्सुकता

खरा विठ्ठल तोच असतो जो संकटावेळी मदतीस धावून येत आपली मदत करतो. आपलं रक्षण करतो.…

18 hours ago

कडक उन्हामुळे तापाच्या रुग्णांत वाढ! पारा ३९ अंशाच्या पुढे गेल्याने जीवाची काहिली

शहर व परिसरात गेल्या महिन्यापासून तापमान वाढत आहे. त्यातच मोठ्या प्रमाणावर सण, उत्सव सुरु आहेत.…

18 hours ago

अर्ज भरण्याच्या गर्दीने सर्वसामान्यांना त्रास,भर उन्हात वाहनांच्या रांगा आणि पोलिसांना ताप

सोमवारी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज (rush to fill…

18 hours ago