‘लय भारी ‘ ने काही दिवसांपूर्वी ‘ गांधी नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलाय का … हा विषेशांक प्रसिद्ध केलाय. रफिक मुल्ला यांनी लिहिलेला हा लेख गांधीजीं संबंधित अनेक विषयांचा उहापोह करणारा आहे
घटना 1915 मधील
प्रसंग एक- हरिद्वारला कुंभमेळा भरला होता महात्मा गांधी कुंभमेळ्याला ट्रेन ने निघाले होते (relation between mahatma gandhi and islam) ट्रेन सहारनपुरला थांबली एक मुस्लिम युवक पाणी घेऊन आला पण बोगीतल्या अनेकांनी तहान असूनही त्याच्या हातचे पाणी घेतले नाही. गांधींनी आश्चर्याने चौकशी केली, तेव्हा समजले की हिंदू मुस्लिम द्वेष भावनेमुळे दोन्ही बाजूचे लोक असे वागतात. गांधींना लक्षात आले हा प्रश्न फार जटील आहे.
प्रसंग दोन- दिल्लीच्या लाल किल्ल्यात सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे सैनिक बंदी बनवून ठेवण्यात आले होते. गांधी भेटण्यास गेले, तेव्हा चहाची वेळ होती. मुस्लिम चहा आला होता, मुस्लिम कैद्यांना तो दिला गेला. हिंदू चहा अद्याप यायचा होता. गांधींनी विचारले हा काय चहा आहे…. तेव्हा त्यांना समजले की, सैनिकांमध्ये भेद नाही पण तसं सरकारी आदेश आहे. हिंदू आणि मुस्लिमांना धार्मिक आधारावर वेगळा चहा द्यायचा, असे त्या आदेशात म्हटले होते. गांधी नेहमीच देशातल्या धार्मिक तणावासाठी इंग्रजांना दोषी धरत. तेव्हाचे व्हॉईसरॉय वाबल यांना एका भेटीत त्यांनी तसे स्पष्ट सुनावले होते.तुम्ही आगीत तेल घालण्याचा प्रयत्न करू नका.या विषयापासून दूर राहा. पण इंग्रज त्यांचे काम करीत राहिले.
दक्षिण आफ्रिकेत असल्यापासून गांधींना हे उमगले होते कि, भारतात एकतेची भावना निर्माण केली तरच इंग्रजांविरोधातील लढाई आकार घेऊ शकेल , गांधींनी सर्व पातळ्यांवर तसे प्रयत्न केल्याचे वारंवार दिसते, अगदी खिलाफत चळ्वळीचेही त्यांनी समर्थन केले आणि मुस्लिमधार्जिणे असल्याचा पहिला आरोप त्यांच्यावर केला गेला. उत्तर प्रदेशचे काश्मीरी ब्राह्नण नेते, नावात थेट पंडित असणारे नेहरू तर मूलतः मुस्लिम आहेत, असा खुला अधिकृत प्रचार करण्यापर्यंत विषय पुढे गेला, मात्र अशा आरोपांचे उत्तर दोघेही आपल्या कार्यातून देतात.
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…
आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…
लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…
पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…