व्हिडीओ

नरेंद्र मोदी, अमित शाहांचं धोरण, शिवाजी महाराजांच नाव घ्या, अन् मराठी माणसांना संपवा

नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या सभांचा धडाका महाराष्ट्रात जागोजागी सुरूय(Narendra Modi and Amit shah taking chhatrapati Sivaji Maharaj name) प्रेक्षकहो तुम्ही या दोघांची भाषणं बारकाईनं ऐका. भाषणाची सुरूवातच ते छत्रपती शिवाजी महाराज की जय… या जयघोषणेने करतात. परभणीच्या सभेत तर नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांच्या घोषणेनंतर छत्रपती शाहू महाराजांची सुद्धा घोषणा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा ते घोषणा करतात. भाषणाच्या सुरूवातीला नरेंद्र मोदी मराठीत सुद्धा बोलतात. नरेंद्र मोदी यांचं मराठीत बोलणं. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच नाव घेणं… हे कुठल्याही मराठी माणसाला भावतं. नरेंद्र मोदी ज्यावेळी आपल्या भाषणात या महापुरूषांचे उल्लेख करतात, तेव्हा माझाही उर अभिमानाने भरून येतो. पंतप्रधानांच्या तोंडून आपल्या मराठी भाषेचा, आपल्या महापुरूषांचा गौरव होणं ही किती मोठी अभिमानाची बाब आहे, असं वाटतं. नरेंद्र मोदी हे ढोंगी आहेत, हे माहित असून सुद्धा माझ्यासारख्या व्यक्तीची छाती त्यांच्या जयघोषणेने भरून येत असेल तर सामान्य मराठी माणूस मोदींच्या मागे किती येडा होत असेल याची कल्पना करा.
मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की, नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडगाळींचं खायचं दात आणि दाखवायचं दात वेगळे आहेत. या दोघांनी मराठी माणसांना, महाराष्ट्राला संपवायचे सगळे प्रयत्न अतिशय ताकदीने चालवलेले आहेत. कसे त्याची माहिती मी मुद्देसुदपणे मांडत आहे. तुम्ही सगळ्यांनी त्यावर जरूर विचार करा. तुम्हालाही ते निश्चितपणे पटतील.
हा व्हिडीओ पुढे पाहण्याअगोदर मी आपणांस कळकळीची आणि अतिशय नम्रपणे विनंती करतो की, आपण आमचा हा ‘लय भारी’ यू ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. आमचे फेसबूक पेज, एक्स हॅण्डल, इन्स्टाग्राम सुद्धा लाईक आणि फॉलो करा. त्यामुळं तुम्हांस असे अभ्यासू व रोचक व्हिडीओ पाहायला मिळतील. ‘खमकी भूमिका, खणखणीत आवाज’ हे आमचं ब्रीद आहे. त्यासोबत निष्ठा ठेवून आम्ही बेधडक व वास्तववादी पत्रकारिता करीत आहोत.

तुषार खरात

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

19 mins ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

2 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

2 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

4 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

4 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

5 hours ago