एज्युकेशन

शाळाबाह्य नऊ हजार मुलांना शाळेत आणले – शिक्षणमंत्री

राज्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा प्रश्न कायम चर्चेत असतो. या प्रश्नावर सरकारला कायम धारेवर धरण्यात येते, असे असताना आता शालेय शिक्षणमंत्री दीपक शेलार यांनी चांगली बातमी दिली आहे. आतापर्यंत शाळाबाह्य नऊ हजार मुलांना शाळेत आणले गेले, अशी माहिती दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली आहे.

राज्यांमध्ये ४६५० मुले आणि ४६७५ मुली शाळाबाह्य होत्या. शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्याची मोहीम प्रत्येक वर्षी राबवली जाते. त्यानुसार यावर्षीही ती राबवली गेली आहे.आतापर्यंत नऊ हजार मुलांना शाळेत आणले गेले आहे. जी ३०० मुले शाळेत आणता येऊ शकली नाही ती विकलांग आहेत अथवा अन्य काही अडचणींमुळे ती दाखल होऊ शकली नाही, मात्र त्यांच्यासाठीही शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

डोंगराच्या कपारीत गाव वसलेले, सायकल देखील जावू शकत नाही; एकनाथ शिंदे यांनी सांगितला इर्शाळवाडीच्या काळरात्रीचा अनुभव!

मणिपूर महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांनी चर्चेस नकार दिल्याने काँग्रेसचा सभात्याग

मुंबईत मुसळधार पावसाचा हार्बर मार्गावरील लोकल सेवेला फटका  

राज्य सरकारने राज्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शिक्षण हक्क कायदा आणला. पण अनेकदा स्थलांतरित मजूर, गरीब नागरिक यांच्या मुलांना घरातील आर्थिक परिस्थितीने शाळा सोडावी लागते. एखादा मुलगा नापास झाल्यास तो शाळेत जात नाही. त्यामुळे राज्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा प्रश्न गहन झाला होता. तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्याची मोहीम सुरू केली होती. तेव्हापासून शाळाबाह्य विद्यार्थ्यांनी शाळेत यावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

विवेक कांबळे

Recent Posts

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

23 mins ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

3 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

3 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

4 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

4 hours ago

पावसाळ्यात या 5 प्रकारच्या तेलांनी करा केसांना मसाज, केसगळतीपासून मिळेल आराम

पावसाळ्यात केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या वाढते. वास्तविक या काळात पावसात भिजल्यामुळे केसांची मुळे कमकुवत…

7 hours ago