टीम लय भारी
पुणे : वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2022 नुसार फिनलॅंडला सलग पाचव्या वर्षी सर्वात आनंदी राष्ट्र म्हणून स्थान देण्यात आले, द अकॅडमी स्कूल (TAS), पुणे यांनीही हा आनंद विद्यार्थ्यांना देण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. ज्यामुळे भारताचे भविष्य चांगले होईल. TAS ही संस्था फिनलॅंड मॉडेलचा वापर करुन एक साधन म्हणून शिक्षणाद्वारे भारताला आनंदी राष्ट्रात रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. TAS ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 मॉडेल आयसीएसई शाळा आहे आणि ती फिनलँड शिक्षण प्रणालीनुसार अध्यापनशास्त्राचे अनुसरण करत आहे.
लर्निंग मॉडेल सादर करणारी ही महाराष्ट्रातील पहिली शाळा आहे आणि एनईपी दत्तक घेतलेल्या पहिल्या शाळांपैकी एक आहे.
अहवालानुसार, फिनलॅंडपहिल्या क्रमांकावर आनंदी राष्ट्र ओळखले जाते तर भारत १३६ व्या क्रमांकावर आहे. फिनलॅंड एज्युकेशन मॉडेल हे जगातील आघाडीचे शैक्षणिक प्रकल्प म्हणून ओळखले जाते आणि ते इतर राष्ट्रांकरिता प्रेरणादायी ठरत आहे. ही शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास आनंदी बनविण्यावर लक्ष केंद्रित करते.
शिक्षण, ज्ञान आणि शहाणपण मुलांच्या, नागरिकांच्या आणि त्यांच्या राष्ट्राच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. आनंदी मुले हे देशाचे जबाबदार नागरिक आहेत, असे म्हणायला हरकत नाही. TAS चे उद्दिष्ट हेच आहे की विद्यार्थ्यांना आनंदी बनवणे आणि अशा आनंदी वातावरणातच शैक्षणिक विकास करणे. TAS भारतीय विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक क्रांती घडविण्याचा मुख्य उद्देश होता जो देशात नक्कीच प्रगती घडवून आणेल अशी प्रतिक्रिया डॉ. मैथिली तांबे, सीईओ, TAS यांनी व्यक्त केली.
फिनलँड शिक्षण प्रणालीनुसार शाळा हा आनंद निर्माण करणारा अभ्यासक्रम आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यात महत्त्वाची भुमिका बजावते. TAS ही एक ना-नफा ना तोटा संस्था आहे, त्याच रीतीने मुलांचे संगोपन करणे आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास आणि सर्वांगीण विकास यातूनच विद्यार्थ्यांना उत्तम नागरिक बनवणे हे मुळ उद्दिष्ट ठेवते. अभ्यासक्रम आणि त्यांची शिकवण्याची पद्धत विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करते आणि देशाच्या सर्वांगीण विकासालाही हातभार लावू शकते.
डॉ. तांबे पुढे सांगतात की, TAS स्थापना अपारंपरिक, नाविन्यपूर्ण आणि प्रगतीशील शिक्षण पद्धतींद्वारे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे ओझे न वाटू देता हसत खेळतही ज्ञान मिळविता येते या उद्देशाने हा उपक्रम राबविला. हॅपी अॅट स्कूल ही आमची मुख्य संकल्पना असून विद्यार्थी, पालक आणि या प्रवासातील प्रत्येकालाच आनंदी ठेवण्याचा आमचा उद्देश आहे.
महाराष्ट्रातील मुलांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने ग्रामोदय ट्रस्टने 2015 मध्ये पुण्यात TAS ची स्थापना केली. TAS ची स्थापना अपारंपरिक, नाविन्यपूर्ण आणि प्रगतीशील शिक्षण पद्धतींद्वारे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी करण्यात आली. TAS हे शिक्षण क्षेत्रातील दीर्घ वारसा आणि अनुभवाचे उत्पादन आहे. ग्रामोदय ट्रस्ट हा SMBT आणि अमृतवाहिनी एज्युकेशनल ट्रस्टचा एक भगिनी ट्रस्ट आहे. हे नाशिक, संगमनेर (अहमदनगर) आणि पुणे येथे वैद्यकीय, दंत, अभियांत्रिकी, फार्मसी, आयुर्वेदिक वैद्यकीय इत्यादी क्षेत्रातील शैक्षणिक संस्था चालवते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना…
हिरावाडी रोडवरील (Hirawadi Road) नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना (pipes)…
नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी…
एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने…
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)…
उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…