मुंबई : मुंबईकरांवरील 15 टक्के पाणी कपात रद्द कारण्यात आलेली आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. भातसा धरणातील विद्युत बिघाड अद्याप दुरुस्त झालेला नसला तरी पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात पालिकेला यश आले आहे. भातसा धरणातून दोन हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा मिळू लागलाअसल्यामुळे मुंबईकरांवरील १५ टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.
भातसा धरणाच्या विद्युत यंत्रणेत २७ फेब्रुवारीला झालेला बिघाड दुरुस्त होण्यास आणखी किमान पंधरा दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे मुंबईतील १५ टक्के पाणी कपात अजून काही दिवस सुरूराहण्याची शक्यता होती. ही दुरुस्ती अद्याप झालेली नसली तरी मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भातसा धरणातून दोन हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बिघाड दुरुस्त होण्यास वेळ लागणार असल्यामुळे मुंबईला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेच्या जल अभियंता विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
त्यासाठी वेगवेगळे पर्याय जल अभियंता विभाग तपासून पाहत होता. मात्र भातसा धरणातूनच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आल्यामुळे पाणी कपातीचे संकट टळले आहे. दरम्यान, विद्युत केंद्रातील बिघाडाची दुरुस्ती करण्यात तांत्रिक अडचणी येत असून दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, अतिरिक्त पाणीसाठा करून ठेवू नये, असे आवाहन पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्याने केले आहे.
लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…
अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…
एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…
गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…