महाराष्ट्र

मोठी बातमी : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव झाले; केंद्र सरकारने दिली मंजुरी !

औरंगाबाद आणि उस्मानाबद शहरांच्या नामांतराला आज केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. यापुढे औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर तर उस्मानाबाद शहराचे नाव आता धाराशिव असणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सत्ताबदलापूर्वी शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन्ही शहरांच्या नामांतराला मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी दिली होती. त्यानंतर मविआ सरकार पडल्यानंतर शिंद-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर तो निर्णय अल्पमतात घेतल्याचे म्हणत रद्द केला. त्यानंतर मात्र पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारने त्यात थोडी दुरुस्ती करत संभाजीनगर ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करत पुन्हा प्रस्ताव मंजूर करुन केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्या प्रस्तावाला आज केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. (Aurangabad’s Chhatrapati Sambhajinagar and Osmanabad’s Dharashiv Central Govt approves renaming)

सन १९९९ साली युती सरकारच्या काळात दोन्ही शहरांच्या नामांतराची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर गेली कित्तेक वर्षे हा प्रस्ताव मार्गी लागलेला नव्हता. सन २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर अडीच वर्षे कालखंड लोटत असताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत ४० आमदार आपल्यासोबत घेत भाजपसोबत सरकार स्थापन केले. मात्र उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळण्याआधी मंत्रिमंडळ बैठकीत संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराचा निर्णय घेतला. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरेंचा निर्णय अल्पमतातील सरकारने घेतलेला निर्णय ठरवत तो रद्द केला. मात्र त्यावर टीका होऊ लागल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने नामांतरामध्ये थोडा बदल करत संभाजीनगर ऐवजी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असा नामांतराचा प्रस्ताव मंजूर करत तो केंद्र सरकारकडे मंजूरीसाठी पाठविला होता. याच सोबत त्या बैठकीत नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील असे नामकरण करण्याचा निर्णय झाला होता.
आज केंद्र सरकारने नामांतराला मंजूरी दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरव्दारे नामांतराची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी… औरंगाबादचे छत्रपतीसंभाजीनगर. उस्मानाबादचे धाराशिव… मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि केंद्रीय गृहमंत्री मा.अमितभाई शाह यांचे मनःपूर्वक आभार…

तर उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ ! राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी ! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’…!

प्रदीप माळी

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

13 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

13 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

14 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

14 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

14 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

16 hours ago