महाराष्ट्र

गावातील खराब रस्त्याने घेतला चिमूरड्याचा जीव

टीम लय भारी 

औरंगाबाद : गावात असलेल्या खराब रस्त्यामुळे (Bad Road) एका आठ वर्षीय मुलाचा जीव गेल्याची (The bad road in the village took the life of the little boy) संतापजनक घटना घडली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लखमापूरमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे गावात राजकीय नेत्यांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय पुढाऱ्यांनी फक्त स्वतःचा विचार न करता सामान्य नागरिकांचा सुद्धा विचार करावा, असे मत गावातील लोकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लखमापूर येथे राहणाऱ्या कृष्णा परदेशी या आठ वर्षाच्या चिमुकल्याच्या पोटात अचानक दुखू लागले. यामुळे त्याचे वडील बाबुलाल परदेशी त्याला त्यांच्या दुचाकीवरून गंगापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात होते. पण गावाच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे चिखल झाल्याने त्यांची दुचाकी त्या चिखलात फसली. अनेक प्रयत्न करूनसुद्धा हि दुचाकी चिखलातून बाहेर निघाली नाही. याचवेळी चिमुकल्या कृष्णाला पोटात होणाऱ्या वेदना असह्य झाल्याने त्याच्या वडिलांसमोरच त्याने प्राण सोडला.

दरम्यान, गावातील लोकांमध्ये घडलेल्या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर राजकीय नेत्यांबद्दल असंतोष देखील निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी सरकारकडून सत्तेवरून पायउतार होत असताना औरंगाबादचे नाव संभाजी नगर करण्यात आले. पण याचे श्रेय मिळविण्यासाठी या निर्णयाला स्थगिती देत शिंदे-भाजप सरकारने पुन्हा औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर करण्यात येईल, असे घोषित केले. राजकीय स्वार्थासाठी नेतेमंडळी एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहे. सध्याचे राजकारण तर इतके दूषित झाले आहे की प्रत्येक राजकीय नेता मी श्रेष्ठ कसा ? हेच दाखवून द्यायच्या मागे लागला आहे.

परंतु या राजकीय संघर्षामध्ये सामान्य नागरिक मात्र भरडला जाऊ लागला आहे. गेल्या २४ दिवसात ७० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या घडणाऱ्या सर्व घटनांना जबाबदार कोण ? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. मात्र लखमापूर येथे घडलेली ही घटना अत्यंत निंदनीय असून राजकीय पुढाऱ्यांनी राजकीय वाद बाजूला ठेऊन ग्रामीण भागाच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे, अशी विनंती सध्या करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा :

बाळासाहेबांच्या स्नुषा स्मिता ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

शिवसेनेच्या काही बंडखोरांसाठी उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख

हार्बर मार्गावरील लोकल सेवा पुन्हा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

पूनम खडताळे

Recent Posts

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

35 mins ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

1 hour ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

2 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

2 hours ago

पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का ?; देवेंद्र फडणवीस

हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

3 hours ago

‘मदत फाऊंडेशन’चा कौतुकास्पद उपक्रम, पक्ष्यांकरिता शेकडो पाणवठ्यांची व्यवस्था

'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…

3 hours ago