टीम लय भारी
मुंबई: मागील सात वर्षांपासून केंद्रातील भाजपाचे सरकार महागाई वाढवत असून आता महागाईने परमोच्च टोक गाठले आहे. सत्तेवर येण्यापूर्वी महागाई कमी करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने सत्तेवर आल्यापासून महागाई वाढवून गरिबांना लुटायला सुरु केले अशी टीका थोरांतांनी केली आहे.
राज्यासह देशात इंधनाच्या दरात सतत वाढ होत आहे. महागाई वाढवणाऱ्या व गरिबांना लुटणाऱ्या केंद्रातील भाजपा सरकारविरोधात महाराष्ट्र काँग्रेस आयोजित महागाई मुक्त भारत महामोर्चात सहभागी होऊन मोदी सरकारचा निषेध केला. सर्वसामान्यांचे जगणे कठिण करणाऱ्या केंद्र सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षात असताना महागाईच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरणारे भाजप नेते कुठे आता गायब झाले आहेत. पेट्रोल, डिझेल महाग झाले की सर्वच प्रकारची महागाई वाढते पण त्यावर भाजपाचा एकही नेता बोलत नाही. जनतेचे प्रश्न सोडून इतर सर्व प्रश्नांवर भाजपचे नेते बोलतात.
शेतकरी वर्षभर आंदोलन करत होते केंद्र सरकारने त्यांच्याशी साधी चर्चा केली नाही, त्यांना गाडीखाली चिरडले. केंद्र सरकारने महागाई वाढवून सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण केले असून अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, आता ही जनताच तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.
हे सुध्दा पहा:
Balasaheb Thorat : महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी आमदार जयकुमार गोरेंची घेतली फिरकी…
Maharashtra: Ajit Pawar and Balasaheb Thorat slam Nashik Commissioner for his charges against revenue officers
जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…
अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…
गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…
गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…
नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…
चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…