तुम्ही कधी चैत्यभूमीवर गेला आहात का? जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना प्रश्न

टीम लय भारी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Dr. Jitendra Awhad) यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी आव्हाड राज ठाकरे यांना काही प्रश्न विचारले आहे. राज ठाकरे तुम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी भरभरुन बोलता पण कधी चैत्यभूमीवर का असा सवाल त्यांनी विचारला आहे. पुढे ते म्हणतात की, आम्ही देवळात जाताना कॅमेरे घेऊन जात नाही असा ही टोला त्यांनी लगावला आहे. आव्हाड यांनी राज ठाकरे यांना सल्ला दिला आहे, की पुस्तक वाचायची असतात. इतिहासाला खेळवू नका असं ही त्यांनी म्हटलं आहे. 

Dr. Jitendra Awhad strongly criticizes the opposition


राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Dr. Jitendra Awhad) यांनी राज ठाकरे यांच्या सभेवर भाष्य केले आहे. आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीकेची झोड उठवली आहे. यासंदर्भात त्यांनी अनेक ट्विट केलं आहे. केवळ राज ठाकरे नाही तर त्यांनी भाजपच्या बुस्टर डोस सभेवर टीका केली आहे. Dr. Jitendra Awhad strongly criticizes the opposition

डॉ. जितेंद्र आव्हाड  (Dr. Jitendra Awhad)  यांनी विरोधकांनावर टीका करत काही ट्विट केले आहे. देव कणाकणात आहे त्याची चर्चा सोडा! लोकशाहीच्या मंदिरातील जनता जनार्दन नावाच्या देवाची चिंता करा! ह्या देवाचा श्वास कोंडला आहे परिस्थीमुळे, महागाईचा डोंगर त्या देवावर कोसळला आहे, असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

कालच्या भाषणात राज ठाकरे यांनी असे म्हटलं होते की, रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली. त्या टिळकांनाही तुम्ही ब्राम्हण म्हणून बघणार का, असा सवालही ठाकरेंनी केला होता. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आव्हाड (Dr. Jitendra Awhad) यांनी 1818 मधील एका लिखाणाचा संदर्भ दिला आहे.

या पत्रात  शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार टिळकांनी केला नाही, असा दावा केला आहे. याबाबत आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध आणि त्याचे पूर्ण बांधकाम याबाबतचे सगळे ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध आहेत. त्यावरून हे सिद्ध होते कि लोकमान्य टिळकांनी समाधी बांधण्यासाठी समिती स्थापन केली होती, पैसेही जमा केले होते पण त्यांनी जीर्णोद्धार केला नाही.


 

हे सुद्धा वाचा : 

 भोंगे लावून किंवा हटवून महागाई कमी होणार आहे का?- जितेंद्र आव्हाडांची खोचक टिका

Punjab HC Stays Arrest of Former AAP Leader Kumar Vishwas Over Alleged ‘Inflammatory Remarks’ on Kejriwal

Shweta Chande

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

6 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

7 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

7 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

7 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

9 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

9 hours ago