आपल्या देशामध्ये एखादी मोठी घटना घडली की, सरकारचे आणि नेते मंडळींचे डोळे उघडतात. सरकारने 1 जुलै 2019 पासून कंपन्यांना सीट बेल्ट रिमाइंडर लावणे अनिवार्य केले आहे. तरी देखील अनेक जण सीट बेल्ट लावत नाही. बऱ्याच वेळा मागच्या सीटवर बसलेली व्यक्ती सीट बेल्ट लावत नाही. मिळालेल्या माहितीनुसार 2020 मध्ये रस्ता दुर्घनेमध्ये 15,146 जणांना सीट बेल्ट न लावल्यामुळे आपला जीव गमवावा लागला. दररोज 41 जणांना रस्ते आपघातामध्ये आपले प्राण गमवावे लागतात. 2024 पर्यंत रस्ते दुर्घटना 50 टक्के कमी करण्याचे सरकारचे प्रयत्न आहे असे एका मुलाखतीमध्ये केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी सांगितले.
त्यासाठी इंटरनॅशनल सिक्युरिटी सॅन्डर्ड फॉलो करण्या येईल. गडकरींनी भारतातील चारचाकी निर्मीती करणाऱ्या कंपन्यांना एअरबॅग असायलाच हव्या असे सांगितले आहे. मात्र या कंपन्या निर्यात होणाऱ्या गाडयांना सहा एअर बॅग लावतात आणि भारतातील गाडयांना केवळ चार एअर बॅग लावतात. कारण सहा एअर बॅग लावली की, गाडीची किंमत ही 50 ते 60 हजारांहुन जास्त होते. मात्र नितीन गडकरींनी यावर स्पष्ट केले की, येणाऱ्या काळात एका एअर बॅगची किंमत केवळ 900 रुपये असेल आणि भारतील प्रत्येक गाडीमध्ये सहा एअर बॅग असतील.
हे सुद्धा वाचा
Varsha Usgaonkar : वर्षा उसगावकर यांना मिळणार सडलेले मासे !
Navneet Rana : नवनीत राणांना ‘तोंड सांभाळण्याचा’ शिवसेनेचा इशारा
Asia Cup 2022: भारताला आज स्पर्धेत टिकून राहण्यासाठी श्रीलंकेविरूद्ध जिंकणे अंत्यत निकडीचे
दोन दिवसांपूर्वी अहमदाबाद-मुंबई महामार्गावर टाटा ग्रुपचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात त्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर महामार्गा संबंधी विषयावर अनेक चर्चा सुरू आहेत. सायरस मेस्त्री यांची कार सुर्या नदीवर ओवटेकिंगच्या वेळी डिवाइडरवर आदळली.
आयएए वर्ल्डच्या मिटींगमध्ये नितीन गडकरी म्हणाले की, 20 हजारहून अधिक पीसीयुचा ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी सहा लेनच्या रस्त्यांची गरज आहे. तसेच कारमध्ये मागे बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना सीट बेल्ट लावणे गरजेचे आहे. सायरस मेस्त्री यांनी सीट बेल्ट लावला नव्हता. ते या प्रवासामध्ये मागे बसले होते.
मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…
शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…
पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…