महाराष्ट्र

देशात हजारो कोटींचे बेकायदेशीर फॉरेक्स ट्रेडींग रॅकेट; किसान आर्मी व वॉटर आर्मीची कारवाईची मागणी

आरबीआयचे निर्देश, फेमा व इतर कायद्याचे उघडपणे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या लोकांची फसवणूक करून सोलापूर, पुणे, नागपूर, मुंबई, सातारा आदी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यासह देशातील गुजरात, कर्नाटक, राजस्थान, ओरिसा, कर्नाटक आदी अनेक राज्यात सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बेकायदेशीर फॉरेक्स (forex)ट्रेडींग रॅकेटवर तात्काळ कारवाई करा, या रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या देशातील व परदेशातील दोषी व्यक्तीवर कारवाईसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने या रॅकेटची पाळेमुळे शोधण्यासाठी तत्काळ एक विशेष कृती दल स्थापून मोहीम तत्काळ राबवा आणि या सर्व बेकायदेशीर प्रकारात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदाराची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक त्यांना तत्काळ परत करा, अशी मागणी किसान आर्मी व वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी ईडी व पोलिसांकडे केली.

3 फेब्रुवारी 2022 रोजी आरबीआयने बेकायदा इटिपीवरून ट्रेडींग करू नका अन्यथा फेमा कायद्यांतर्गत संबंधितावर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा दिला होता. तरीही सोलापूर, पुणे, मुंबई, नागपूर,सातारा, विजापूर आदी जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात व देशात अनेक राज्यात कोट्यावधी रुपयांचे बेकायदेशीर फॉरेक्स ट्रेडींग चालू आहे. फसवणूक करणारे लोक गुंतवणूकदारांना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला तर आम्ही तुमची गुंतवणूक परत करणार नाही अशी धमकी देत असल्याने हे गुंतवणूकदार सैरभैर झाले आहेत.

हा सर्व प्रकार अत्यंत बेकायदेशीर असून या घोटाळ्याची व्याप्ती कोट्यावधी रुपयांची असू शकते. महत्त्वाचे म्हणजे हा सर्व प्रकार मला थेट राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर वाटत आहे. यासाठी हे पत्र मी जबाबदार यंत्रणा म्हणून ईडीला व राज्य पोलिस विभागाला अवगत करण्यासाठी सादर केल्याचे प्रफुल्ल कदम यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

‘धर्मवीर २’ सिनेमा हिंदीतही यायला हवा’

मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पांड्याचंं कमबॅक; गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल

‘छगन भुजबळांनी हॉटेल जाळलं, पोलिसांनी एकमेकांवर हल्ले केले’

यातील फसवणूक करणारी मंडळी काही आपल्या देशात तर काही परदेशात आहेत. या सर्वांचा हा बेकायदेशीर कारभार एवढा उघडपणे कसा चालू आहे याचे आश्चर्य वाटत आहे. भारतात ईडी, पोलीस आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा यासारख्या यंत्रणा असताना एवढ्या मोठ्या उघड बेकायदेशीर कारभारावर सनियंत्रण कसे नाही हाही प्रश्न आहे. यातून देशातील नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक तर होत आहेच, त्याचबरोबर भारतातील पैसा बेकायदेशीरित्या परदेशात जात असल्याने राष्ट्रीय सुरक्षेतेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याचे प्रफुल्ल कदम यांनी सांगितले.

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago