महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी.. गणेशोत्सव काळात पाऊस जोर पकडणार!

राज्यात दुष्काळप्रवण स्थिती निर्माण झालेली असताना ऐन गणपती आगमनाच्या काळात राज्यात पावसाची शक्‍यता आहे. १९ सप्टेंबरला गणपती बाप्पांच्या आगमनासोबतच पाऊस देखील सक्रिय होईल, अशी आनंदवार्ता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली आहे. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात राज्यातील बहुतांश भागात पावसाने दडी मारली. राज्यातील अनेक ठिकाणी पाण्याचे संकट उभे राहिले आहे. राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी ही जोर धरू लागली आहे. धरणांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणीसाठा नसल्यानं कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतात पेरणा झाल्यानंतर पावसात मोठा खंड पडल्याने पिके करपली. राज्यातील काही भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
गेल्या शनिवारपासून मुंबई, ठाण्यात पावसाने जोर पकडला आहे. राज्यातील इतर भागात केवळ ढगाळ वातावरण दिसून येत असताना, येत्या पंधरा तारखेपासून राज्यात आठवडाभर पावसाचा मुक्काम राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.

गणपतीच्या आगमनाच्या दोन-चार दिवस अगोदरच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. येत्या दिवसात बंगालच्या उपसागरात वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण होणार आहे. भाड्यांची चक्राकार स्थिती आणि कमी दाबाचा पट्टा यांच्या संमिश्रणातून राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. १५ आणि २३ सप्टेंबर दरम्यान राज्यात मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तरीही राज्यातील दुष्काळजन्य स्थिती या दिवसांच्या पावसाने तारली जाईल, याची फारच कमी शक्यता आहे.
हे ही वाचा
सध्या पडत असल्या पावसाची तीव्रता गुरुवारपर्यंतच राहील. बुधवारपासून राज्यातील बहुतांश भागात पाऊस कमी होईल. याच दरम्यान बंगालच्या उपसागरात वाऱ्यांची चक्राकार स्थिती आणि कमी दाबासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. दोन्ही स्थिती निर्माण झाल्यानंतर संपूर्ण कोकण, नाशिक,कोल्हापूर आणि सह्याद्रीचा घाटमाथाचा परिसरात पावसाची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
टीम लय भारी

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

5 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

6 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

9 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

9 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

9 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

10 hours ago