टीम लय भारी
इंदौर : इंदौरहून जळगाव येथील अंमळनेर येथे निघालेली एसटी बस नर्मदा नदीत कोसळून काल भीषण अपघात झाला, यामध्ये 12 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. अचानक ओढवलेल्या या आपत्तीने अवघा महाराष्ट्र हळहळला. दरम्यान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या 12 जणांवर आज मध्य प्रदेशातील धार येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
एसटी अपघातात मृत्यू झालेल्या 12 जणांपैकी अद्याप 7 जणांची ओळख पटली आहे. यातील चार जण जळगावचे, एक मुर्तीजापूर आणि दोन राजस्थान येथील असल्याची माहिती मिळाली आहे.
बसमध्ये साधारण 50 ते 55 प्रवासी होते, त्यापैकी केवळ 15 जणांनाच वाचवण्यात यश आले, बारा जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण बेपत्ता आहेत. त्यामुळे नर्मदा नदीपात्रात शोधकार्य सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
अमळनेर खलघाट ठिगरी येथे काल सकाळी पावणे दहाच्या सुमारास एसटीला भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले. यामध्ये वाहकाचे बसवरील नियंत्रण सूटल्याने बस पुलावरून थेट नर्मदा नदीत कोसळली. संजय सेतू पुलावर ही घटना घडली.
इंदौरपासून सुमारे 80 किमी अंतरावर हा अपघात घडला. दरम्यान, खलघाटमध्ये बस इतर वाहनांना ओव्हरटेक करीत असताना तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वाहकाचे नियंत्रण सुटले असावे असा अंदाज बांधला जात आहे.
या बसमध्ये सात कुटुंब होती, तर यामध्ये 13 लहान मुले होती. आतापर्यंत केवळ 15 जणांना वाचवण्यात यश आले असून अद्याप अनेक जण बेपत्ता आहेत त्यामुळे शोधकार्य जोरात सुरू आहे.
हे सुद्धा वाचा…
VIDEO : सामान्यांना संकटात टाकण्याचा नवा डावपेच
शिवसेना हा ‘नोंदणीकृत’ राजकीय पक्ष; शिवसेना ‘गट’ नाही- संजय राऊत
नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी…
एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने…
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)…
उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…
गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…
दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…