मंत्रालय

Mantralay News : हेमराज बागुल यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक पदी नियुक्ती

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक (प्रशासन) या पदी हेमराज बागुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाचा कार्यभार हेमराज बागुल यांनी गुरुवारी (ता. 17 नोव्हेंबर) मंत्रालयात स्वीकारला. विभागाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्या उपस्थितीत संचालक (वृत्त व जनसंपर्क) गणेश रामदासी यांच्या हस्ते हेमराज बागुल यांनी त्यांच्या नव्या पदाचा पदभार स्वीकारला. याप्रसंगी उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे, उपसंचालक (प्रशासन) गोविंद अहंकारी, उपसंचालक (प्रकाशने) अनिल आलुरकर, उपसंचालक (प्रदर्शने) सीमा रनाळकर आदी उपस्थित होते. या सर्व अधिकाऱ्यांनी बागुल यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.

तसेच महासंचालनालयाचे असलेले नागपूर-अमरावती विभाग आणि औरंगाबाद-लातूर विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही हेमराज बागुल यांच्याकडे देण्यात आला आहे. बागुल यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी तसेच महासंचालनालयात प्रकाशने, महान्यूज, वृत्त आदी शाखांमध्ये उत्तम जबाबदारी सांभाळली आहे. शासकीय सेवेत येण्यापूर्वी हेमराज बागुल यांनी पत्रकारिता क्षेत्रात देखील योगदान दिले आहे. तसेच साहित्यविषयक विविध पुरस्कारांनी हेमराज बागुल यांना याआधी सन्मानित करण्यात आले आहे.

16 नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय पत्रकारिता’ दिवस म्हणून साजरा करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत राहिलेल्या हेमराज बागुल यांनी या विशेष दिनानिमित्त नागपूर येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर प्रेस क्लब आणि श्रमिक पत्रकार संघ यांनी नागपूर प्रेस क्लब येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यावेळी ‘राष्ट्राच्या उभारणीत माध्यमांची भूमिका’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या विषयावर हेमराज बागुल यांनी आपले मत मांडले.

हे सुद्धा वाचा

Recruitment : नोकरभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी सरकारचा मोठा निर्णय

Narayan Rane : अखेर राणेंनी स्वत:च ‘अधीश’ बंगल्यावर चालवला हातोडा

Eknath Shinde Prakash Ambedkar Meeting:एकनाथ शिंदे प्रकाश आंबेडकरांच्या घरी; काय झाली चर्चा?

‘माध्यमांचा विकास हा कालानुरूप होत आहे. माध्यमांनी काळानुरूप आपली भूमिका बदलली आहे. छापखान्याचा शोध हा गेल्या काही काळातील सर्वात मोठा शोध आहे. छापखान्याच्या शोधानंतर धर्मग्रंथाची छपाई सुरु झाली. यातून वैचारिक मंथन होण्यास सुरुवात झाली. प्रारंभी सामाजिक परिवर्तनाला माध्यमांनी प्राधान्य दिले. माध्यमांनी केवळ प्रबोधनात्मक भूमिकेवर कायम न राहता सिंहावलोकन करीत केंद्रबिंदू ठेवायला हवा,’ असे मत हेमराज बागुल यांनी व्यक्त केले.

पूनम खडताळे

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

12 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

13 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

13 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

13 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

14 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

15 hours ago