टीम लय भारी
मुंबई : शहरात पावसाने धुमाकुळ घालायला सुरूवात केली आहे. अगदी पहिल्या पावसात नेहमीप्रमाणे मुंबईची ‘तुंबई’ झाली, मुंबईकरांची दाणादाण उडाली आणि सत्ताधारी – विरोधकांमधील आरोपप्रत्यारोपाची गाडी पुन्हा वेग धरू लागली. दरम्यान, पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांची चाळण झाल्याचे पाहायला मिळाले आणि नेमका हाच मुद्दा लावून धरत आशिष शेलार यांनी महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांना “भ्रष्टाचाराचे खड्डे पडले” असे म्हणून बोचरी टीका केली आहे.
अॅड आशिष शेलार यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून महापालिकेवर अनेक वर्षांची सत्ता असणाऱ्या शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला असून सद्यस्थितीतील भीषण सत्य त्यांनी उघड करण्याचा प्रयत्न केला आहे.
आमदार आशिष शेलार त्यांच्या ट्विटर पोस्टमध्ये लिहितात, “25 वर्षांत मुंबई महापालिकेने रस्ते बांधकाम आणि रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी तब्बल 21000 कोटींहून अधिक खर्च केले. तरी, सालाबादप्रमाणे पहिल्या मोठ्या पावसात रस्त्यांची चाळण झाली आहे. भ्रष्टाचाराचे खड्डे उघडे पडले असे म्हणून महापालिकेच्या कामाचा लेखाजोखा मांडून त्यांनी कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.”
पुढे शेलार म्हणतात, “25 वर्षे सत्ता असणाऱ्यांनी मुंबईकरांसाठी पहा काय करून दाखवले”, असे म्हणून सर्वसामान्य मुंबईकरांना महापालिकेच्या कर्त्याधर्त्यांच्या कामचुकारपणाची पुन्हा आठवण करून दिली आहे.
हे सुद्धा वाचा…
अबब ! IAS अधिकाऱ्याचा बेफिकीरपणा, ४ लाख गोरगरीब विद्यार्थ्यांचे अडवले ६३६ कोटी !
सध्या लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरु असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून जोरदार प्रचार चालू आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी…
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya ) सण शुक्रवारी (दि. १०) उत्सहात…
इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील तरुणाचा भर रस्त्यात तरुणाचा कोयत्याने वार करत आणि बंदुकीतून गोळ्या झाडत…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत…
सुपरस्टार उमेश कामत आणि प्रिया बापट (Umesh Kamat and Priya Bapat) यांची प्रमुख भूमिका असलेले…
वेगाने वाढणाऱ्या नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…